कनेक्शन तोडणी व विजबील वसुली विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन छेडणार....।
....विज बिल वसुलीसाठी विद्यमान सरकारचा शेतकऱ्यांना "मेगा शॉक"
..सत्तेवर येताच सहा महिन्याचेआत भाषा बदलली..
...चार महिने वसुली पुढे ढकला, 75 टक्के वीजबिल माफ करा.... आमदार बबनदादा शिंदे
बेंबळे । मुकुंद रामदासी-AJ24Taas News Maharashtra
सहा महिन्यापूर्वी 'शेतकऱ्यांनी वीज बिल देऊ नये' म्हणणाऱ्या विद्यमान सत्ताधारी सरकारने ,विज बिल वसुलीसाठी गावोगावची वीज बंद करून राज्यातील तमाम शेतकरी व कष्टकरी जनतेला एक" मेगा शॉक" दिला असून याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार बबनदादा शिंदे यांनी दिला आहे.
याबद्दल सविस्तर माहिती देताना आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना विरोधी पक्ष भाजपचे नेते राज्यातील शेतकऱ्यांना आव्हान करत होते की शेतकऱ्यांनो वीज बिल भरू नका, शासनाने शेतीसाठी दिवसा योग्य दाबाने बारा तास वीज पुरवठा करावा, म.वी.आ. सरकार वीज बिलाची पठाणी वसुली करते आहे ती प्रक्रिया बंद पाडा, शेतकऱ्यांनी याविरुद्ध तीव्र आवाज उठावावा आम्ही तुमच्या बरोबर आहोत ......परंतु आता सत्तेवर येतात एकनाथ शिंदे- -देवेंद्र फडणीस यांचे सरकारला अवघ्या चार-पाच महिन्यातच विज बिल वसुलीसाठी शेतकरी व तमाम जनतेला मेगा शॉक देण्याची बुद्धी कशी सुचली...? असा परखड व रास्त सवाल आमदार बबनदादांनी शासनाला अधोरेखित करून दाखवला आहे .आमदार बबनदादा शिंदे पुढे म्हणाले की विद्यमान शासनाने वीज बिल वसुलीसाठी गावोगावची वीज कनेक्शन्स तोडणे संबंधी किमान पंधरा दिवस अगोदर नोटीस काढून कळवायला पाहिजे होते. अचानक वीज कनेक्शन्स तोडणी सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाच्या लागणी थांबल्या आहेत, शेतात पसरलेले उसाचे बेणे वाळून चालले आहे, वाड्यावस्तीवर विहीर बोअर किंवा नदी कालवा इ. ठीकाणी मोटारी बंद पडल्यामुळे डाळिंब, द्राक्ष, केळी आदी फळबागांना पाणी मिळणे बंद झाले आहे, कांदा व भाजीपाला यांच्या लागणी होऊ शकत नाहीत, चारावैरणीसारखी पिके जळून जाऊ लागली आहेत, रब्बी गहू हरभरा मका सूर्यफूल ज्वारी इत्यादी नुकतीच उगवलेली पिके पाण्याअभावी जळून जाण्याची भीती निर्माण झालेली आहे, हजारो नागरिक व पशुधनाला पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे, पिठाच्या गिरण्या बंद पडल्या आहेत, नागरिक भात शिजवून खाऊ लागले आहेत, विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नाही अशी बिकट वेळ या शासनाने सध्या शेतकरी व तमाम जनतेवर आणून ठेवली आहे. अधिक बोलताना आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे व अतोनात नुकसान झाले आहे, हाती आलेली खरीप पिके वाया गेली आहेत, केळी डाळिंब पपई सोयाबीन तुरी मका बाजरी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, शेतात वापसा नसल्यामुळे अनेकांच्या ऊस तोडणी लांबलेल्या आहेत, अद्याप 85% शेतकऱ्यांचे ऊस जागेवरच उभे आहेत, अतिवृष्टीमुळे जाहीर केलेली नुकसान भरपाई मदत शासनाने अद्याप शेतकऱ्यांना दिलेली नाही. वीज बंद पडल्यामुळे गावोगावी बँका शाळा कॉलेज शासकीय कार्यालयातील संगणक यंत्रणा बंद पडलेले असून विद्यार्थ्यांचा अभ्यास व जनतेचे सर्व व्यवहार बंद पडले आहेत व नागरिक हतबल झालेले आहेत, वीज बील वसुली साठी वीज बंद यामुळे सर्वत्र प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे व अशा प्रकारे तमाम जनतेला 'हाय पावर शॉक' देणे विद्यमान शासनाला अशोभनीय ठरलेले आहे ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की शासनाने शेतकऱ्यांना विज बिलासाठी चार महिने मुदतवाढ द्यावी व नंतर 75 टक्के वीज बिल माफ करून फक्त 25 टक्के वीज बिल वसुली करावी व किमान 15 दिवस ते तीन आठवडे अगोदर सर्वांना सूचना - आदेश काढावा तरच सध्या निर्माण करण्यात आलेली कृत्रिम अडचण काही प्रमाणात शिथिल ठरेल अन्यथा या शासनाला जनता कधीही क्षमा करणार नाही हे निश्चित व म्हणूनच या वीज बिल वसुली धोरणा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर तीव्रआंदोलन करणार असून होणाऱ्या परिणामास शासन व शासकीय यंत्रणा जबाबदार राहील याची जाणीव असू द्यावी.
चौकट....
कुठे गेले गावो गावचे शेतकऱ्यांचे कैवारी..।
महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार असताना वीज बिल माफ करा, बिल भरू नका,मवीआ सरकार शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करत आहे अशा मोठमोठ्या वल्गना करणारे गावोगावातील नेते व तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदने देऊन सर्वत्र सवंग प्रसिद्ध मिळवण्यासाठी हापापलेले व वरून पुन्हा आम्हीच चळवळीचे कार्यकर्ते आहोत, शेतकऱ्यांचे कैवारी आहोत म्हणणारे व आमच्या वरीष्ठ नेत्यांचा आदेश आम्ही मानणारे कार्यकर्ते..... असा डांगोरा पीटवणारे गावोगावचे नेते...... सध्या सर्वसामान्य जनतेच्या मनातील प्रक्षोभ दूर करण्यासाठी प्रयत्न का करत नाहीत...? ते आता गप्प का बसले आहेत...? हे समजत नाही, सध्या सत्ता त्यांची आहे, त्यांचे नेते मुंबईत सत्तेत आहेत किंवा सत्ताधाऱ्यांचे मित्रपक्ष म्हणून काम पाहत आहेत, मुंबईला त्यांच्याकडे जाऊन वीज बिलाची पठाणी वसुली बंद करा, शेतकरी कष्टकरी जनतेचे हाल थांबवा असे हे का सांगत नाहीत हा एक मोठा प्रश्न आणि कोडे तमाम शेतकरी व जनतेमध्ये निर्माण झाले आहे., पण एक मात्र निश्चित की अशा तथाकथित पुढाऱ्यांना जनता चांगलीच ओळखून आहे व म्हणून वीज बिल वसुली विरोधात शेतकरी व तमाम जनतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सर्वत्र मोठ्या प्रमाणावर आंदोलन करणार आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा