*टेंभुर्णी कुर्डुवाडी बार्शी खराब रस्त्याच पांग फिटलं...*
*कुसळंब ते टेंभुर्णी ७३ कि.मी.तिहेरी मार्गाच काम सुरू...*
*मंजूर होऊनही दहा वर्षांपासून रखडला होता रस्ता...*
अरुण कोरे(पत्रकार)कुर्डुवाडी यांजकडून...
कुर्डुवाडी, गेल्या दशकापासून रखडलेल्या व दुर्लक्षीत टेंभुर्णी-कुर्डुवाडी-बार्शी-लातूर रस्त्याचे काम सुरू झालेने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
हा रस्ता म्हणजे वाहन चालकांसाठी तारेवरची कसरतच होती.तर खराब,खड्डेमयी, अरुंद रस्ते मुळे अनेक अपघातामुळे नागरिकांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.
दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात तिहेरी रस्त्यास मंजुरी देण्यात आली होती.व त्या काळात ८५० कोटी रुपयांचा नियोजित खर्च दाखवण्यात आला होता.
पण कामास सुरुवात करण्याचा मुहूर्त कांहीं करता मिळत नव्हता.
कुसळंब ते टेंभुर्णी ७३ कि.मी.कामास सुरुवात झाली असून अलीपूर (बार्शी)पर्यंत एका बाजूने रुंदीकरण करून खडीकरणाचे काम सुरू केले आहे.दोन्ही बाजूने दिड मिटर रस्ता रुंदीकरण करून करण्यात येत आहे.
दुहेरी, पुन्हा तिहेरी, पुन्हा चौपदरी असा खेळ विलासराव देशमुख यांच्या नंतर चालूच होता.पण विलासरावांनीच तिहेरी रस्त्यास मंजुरी दिली होती....
त्यानंतर अलीकडेच लातूरला सहा पदरी रस्त्यांची झालेली घोषणाही हवेतच विरली.
कुसळंब ते अलीपूर बायपास बार्शी हा पहिल्या टप्प्यातील काम सुरू झाले असून संत रामदास इंन्फ्रास्ट्रक्चर प्रा.ली.कंपनी कंपनी करते आहे.
सध्याच्या रस्त्याच्या वहातूकीस अडथळा येऊ नये म्हणून एका बाजूने रुंदीकरण करून खडीकरणाचे काम सुरू झाले आहे.
पहिल्या टप्प्यातील कामानंतर बार्शी कुर्डुवाडी टेंभुर्णी रोडवरील कामे टप्प्या टप्प्याने करण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा