कोणत्याही काट्यावर वजन करून ऊस आणावा - आमदार बबनराव शिंदे.
कन्हेरगांव दि प्रतिनिधी ( धनंजय मोरे )
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे वजन काटे दरवर्षी तपासणी पथकाकडून तपासून त्याचे प्रमाणपत्र घेतले जाते व काटा सील केला जातो. त्यामुळे वजन काट्याबद्दल काही असंतुष्ट व्यक्ती ऊस उत्पादकामध्ये शंका पसरवत आहेत , त्यामुळे ज्यांना कोणाला शंका वाटते अशा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बाहेर कुठल्याही वजन काट्यावरती आपल्या ऊसाचे वजन करून आणावे व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या काट्यावर ऊस आल्यानंतर त्याच्या वजनाचा मेसेज लगेच ऊस उत्पादकाच्या मोबाईल वरती येतो तो तपासून पहावा , असे आवाहन आमदार बबनदादा शिंदे यांनी केले आहे.
याबाबत आमदार बबनराव शिंदे यांनी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना स्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की , वारंवार त्याच त्याच गोष्टी वजन काट्या बद्दल असंतुष्ट लोकांकडून पसरवल्या जातात चुकीच्या गोष्टी वारंवार कानावर पडल्यावर ती गोष्ट खरी वाटू लागते त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सभासदांनी याची खातरजमा करावी उगाच अफवांवरती विश्वास ठेवू नये कारखाना उभारणीपासून दरवर्षी प्रत्येक सीझनला शासनाच्या आदेशानुसार वजन काटा जिल्हाधिकारी यांच्या भरारी पथकाकडून अचानकपणे तपासला जातो त्यामध्ये लेखापरीक्षक प्रतिनिधी, वजन मापे निरीक्षक, शेतकरी संघटनेचा प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी, वाहन मालक प्रतिनिधी यांचा समावेश या पथकामध्ये असतो तपासणीनंतर त्याचा पंचनामा करण्यात येतो आपल्या कारखान्याचे वजन काटे बरोबर असल्याचे वेळोवेळी पंचनाम्यात सिद्ध करण्यात आले आहे.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नंबर १ युनिट नंबर २ उसाचे वजन काट्यावर वजन झाल्यानंतर लगेचच संबंधित शेतकरी यांच्या मोबाईलवर ऊसाच्या वजनाचा मेसेज पाठवला जातो असे आमदार शिंदे यांनी सांगितले आजपर्यंतच्या कारखान्याच्या ऊस दराबाबत सर्व शेतकरी सभासद खुश आहेत परंतु जे सभासद नाहीत व कारखान्याच्या वजन काट्या बद्दल लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहे कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये एखाद्या तरी सभासदाने याबद्दल प्रश्न उपस्थित केला असता परंतु चांगला चाललेल्या कारखाना याला अडथळा निर्माण करणे काही विघ्न संतोषी माणसाचे काम आहे जे कारखाने दर देत नाहीत एफ आर पी पूर्ण देत नाहीत त्या कारखान्याबद्दल कोणतीही शेतकरी संघटना आवाज का उठवीत नाही? असा सवालही बबनदादा यांनी उपस्थित केला गेल्या वर्षीची परंपरा दहा दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बिल अदा करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले इथेनाॅल निर्मिती वरती शासनाचे चार अधिकारी एपीआय दर्जाचे एक्ससाइज इन्स्पेक्टर तीन शिपाई असा स्टाफ कारखान्याच्या पगाराने येथे निगराणी राखत असतो त्यामुळे त्यामध्ये चोऱ्या होण्याचे कारण नाही रोज सकाळी दहा वाजता साखर आयुक्तांना कारखान्याचा रिपोर्ट हा पाठवावाच लागतो असेही कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांनी यावेळी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा