धाराशिव जिल्ह्यातील 49 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वर्चस्व.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
दि. 18 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये धाराशिव जिल्ह्यातील 166 ग्रामपंचायतीपैकी 49 ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवत शिवसेनेने (उध्दव बाळासाहेब ठाकरे) निर्विवाद वर्चस्व स्थापन केले. स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख माननीय उध्दवजी ठाकरे साहेब तसेच युवासेना प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवत जिल्हाभरातील 49 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा (उध्दव बाळासाहेब ठाकरे) भगवा फडकावला आहे. त्यापैकी धाराशिव तालुक्यातील 18, तुळजापूर 13, कळंब 11, लोहारा 3, उमरगा 2, वाशी 1 व भूम येथे 1 अशा ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले आहे.
त्याचबरोबर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी व इतर घटक पक्षांसोबत आघाडी करुन महाविकास आघाडीचे धाराशिव 11, कळंब 9, लोहारा 2, उमरगा 6, तुळजापूर 08, वाशी 1, भूम 1, अशा 38 ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडी मिळुन धाराशिव जिल्ह्यातील एकुण 87 ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्तापित केले आहे. शिवसेना व महाविकास आघाडीच्या वतीने निवडुन आलेल्या सर्व सरपंच व सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा