ज्यांना तुम्ही डोक्यावर घेतले त्यांनीच तुम्हाला वाऱ्यावर सोडले!!!
पवारांचा नाम उल्लेख टाळत
विखे पाटलांची पवार कुटुंबावर जहरी टीका!!!
करमाळा (प्रतिनिधी)
करमाळा तालुक्यातील जनतेने व पुढाऱ्यांनी ज्यांना वर्षानुवर्ष डोक्यावर घेतले त्या पुढाऱ्यांनी तुम्हाला आज अडचणीत आल्यावर वाऱ्यावर सोडले व तुमचाच कारखाना हडप करण्याचा डाव आखला अशी टीका पालकमंत्री विखे पाटील यांनी करून व्यासपीठावर उपस्थित असलेल्या रश्मी बागल व नारायण पाटील यांच्याकडे पाहत अंगुली निर्देश केला यावेळी या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या वक्तव्याला दाद दिली
आदिनाथ साखर कारखान्यावर कार्यक्रमात बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की सहकार बुडवण्याचे पाप गेल्या वीस वर्षात महाराष्ट्रात झाले आहेत अंतराचा नियम दाखवून नवीन कारखान्याला परवानगी द्यायची नाही मात्र स्वतःचा कारखान्याची क्षमता वाढून पंधरा पंधरा हजार टन उसाचे गाळप करायचे
आता तर सहकारी कारखाने जाणीवपूर्वक अडचणीत आणून सहकारी बँका शिखर बॅंकेना हाताशी धरून लिलाव प्रक्रिया करून विकत घेण्याची दृष्ट प्रवृत्ती वाढली यामुळे सहकार बुडाला शेतकरी आहे तिथेच राहिला
मी एक सहकार चळवळीतला कार्यकर्ता व शेतकऱ्याचा मुलगा म्हणून सहकारी कारखान्याचा खाजगी कारखाना करून विकत घेण्याचे पाप कधी केले नाही तसे मी केले असते तर लोकांनी ग्रामीण भागात बोलायचे म्हणले तर शेण खाल्ल्याचा प्रकार झाला असता
महाराष्ट्रातील सहकार जगला तर शेतकरी जगणार आहे कारखान्याला सर्वतोपरी मदत करण्यास मी कटिबद्ध आहे
खऱ्या अर्थाने आदिनाथ कारखाना वाचवण्याचे काम करणारी आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत हे कौतुकास पात्र आहेत तानाजीराव सावंत यांनी आज एक सहकारी साखर कारखाना वाचवला आहे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने त्यांच्या अभिनंदन करतो
करमाळ्याचे माजी मंत्री स्वर्गीय दिगंबरराव बागल यांच्या प्रयत्नामुळे करमाळ्यातील पाण्याचा प्रश्न सुटला असून दहिगाव सिंचन मंजूर करून सुरू केली कुकडी प्रकल्पाचेकामे पूर्ण करून योजना सुरू करून मांगी तलावात पाणी आणण्याचे काम त्यांनी केले
स्वर्गीय दिगंबरराव बागल माझे चांगले मित्र होते त्यांच्या पवित्र स्मृतीस आठवण करतो असे सांगत त्यांनी अनेक आठवणी स्वर्गीय दिगंबर बागल यांच्या व्यासपीठावरून विशद केल्या
####
हेलिपॅड वर उपस्थित आमदार राम शिंदे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमदार नारायण आबा पाटील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे तालुकाप्रमुख देवानंद बागल
संचालिका रश्मी बागल यांच्या उपस्थितीत पालकमंत्री विखे पाटील यांनी करमाळा तालुक्यातील अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला यात विशेषता करमाळ्यात करमाळ्यात झालेले 1996 च्या स्वर्गीय दिगंबर बागल यांनी आयोजित केलेला पाणी परिषदेचा आवर्जून उल्लेख केला
व करमाळ्याला जी आज कुकडी पाणी व दहिगाव योजनेचे पाणी येत आहे हेच यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी मोठे मदत केल्याचे त्यांनी स्पष्ट केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा