माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे विशेष प्रयत्नातून कोंढेज गावासाठी जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी एक कोटी 13 लक्ष रुपये मंजूर
करमाळा प्रतिनिधी /अलीम शेख
माजी आमदार नारायण पाटील यांच्या प्रयत्नातून कोंढेज ता. करमाळा गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी एक कोटी तेरा लक्ष रुपये मंजूर झाले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की जलजीवन मिशन मधून आता ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय करण्याचे धोरण शासनाच्या पाणी पुरवठा विभागाने हाती घेतले आहे. या जलजीवन मिशन अंतर्गत करमाळा तालुक्यातील कोंढेज गावासाठी आता कायमस्वरूपी पाणी योजना हाती घेता येणार असून माजी आमदार नारायण पाटील यांच्या प्रयत्नातून या कामासाठी तब्बल एक कोटी तेरा लक्ष रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. कोंढेज ता करमाळा या गावासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर होण्याची ही ग्रामपंचायत इतिहासातील पहिलीच वेळ असून यामुळे आता या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. या कामाची निवीदा प्रक्रिया पूर्ण झाली असून संबंधित विभागाकडे निधी सुद्धा वर्ग करण्यात आला आहे. या निधीतून आता कोंढेज गावठाणासाठी आणखी एक नवीन पाणी साठवण टाकी बांधली जाणार आहे. तसेच कोंढेज येथील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठ्या असलेल्या आदलिंग-ननवरे वस्तीवर सुद्धा एक नवीन पाणी साठवण टाकी व वस्तीमधील प्रत्येक घरात नळ व पाईपलाईन द्वारे पाणी पोहोच करण्यात येणार आहे. तसेच कोंढेज गावठाण मधील सर्व भागातील जुनी खराब जल वाहीनी यंत्रणा बदलून नवीन पाईपलाईन टाकून सक्षम पाणीपुरवठा योजना अंमलात येणार आहे. सध्या गावातील आडामधून संपुर्ण गावास पिण्याचे पाणी दिले जात असले तरी भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून आता गावासाठी नवीन स्वतंत्र विहीर निर्माण केली जाणार आहे. कोंढेज ता करमाळा हे गाव आता पिण्याच्या पाण्यासाठी स्वावलंबी होणार असून लवकरच या योजनेच्या कामाचे भूमिपूजन माजी आमदार नारायण पाटील यांच्या शुभहस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती सरपंच सौ अश्विनी सव्वाशे यांनी दिली आहे. माजी सरपंच व विद्यमान ग्रा प सदस्या सौ छाया राऊत व उपसरपंच शहाजी राऊत यांच्या कालावधीत या कामाचा पाठपुरावा करण्यात आला. ग्रा प सदस्य गोविंद लोंढे,सदस्या सौ सारीका आदलिंग, सौ दाळूबाई बादल यांनी सुद्धा या योजनेस निधी मिळावा असा आग्रह माजी आमदार नारायण पाटील यांच्या कडे धरला होता.यामुळेच ही योजना आता अमंलात येत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी माजी आमदार नारायण पाटील गटाचे मा. सरपंच नागनाथ आदलिंग, मा सरपंच दादासाहेब लोंढे-पाटील, मा उपसरपंच नानासाहेब आदलिंग, मधूकर साबळे, संजय लोंढे, आबासाहेब गायकवाड, गणेश सालसकर, निवास सालसकर, श्रीनिवास महामुनी, दादासाहेब माने, बबन माने, संतोष माने, रामभाऊ सुतार, निलेश राऊत, रमेश उंबरे,शिवाजी पंढरपुरे, बाळासाहेब पंढरपुरे, रेवणनाथ आरणे, इकबाल शेख, रज्जाक शेख, अनिल साळवे, संग्राम राऊत, अमीन तांबोळी, जालिंदर माने, चंद्रकांत माने, उमेश चव्हाण, रमेश वाघमोडे आदि उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा