कर्मवीर भाऊराव पाटील विदयालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश
पिलीव /प्रतिनिधी प्रमोद भैस-
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विदयालयातील विदयार्थीनी इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करीत यशाची परंपरा कायम ठेवली.इयत्ता पाचवीमधील 37 विद्यार्थी या परीक्षेस बसले होते त्यापैकी 18 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले यामध्ये 298 पैकी गुण लक्ष्मण करांडे 268 गुण पिलीव केंद्रात प्रथम ,तालुक्यात दुसरा तर जिल्हयात 24 वा ईश्वरी नितीन शिंदे 264 केंद्रात दुसरी ,तालुकायात चौथा जिल्हात 43 व क्रमांक, शरयु देशमुख 236 तालुकयात 20 वा क्रमांक तर इयत्ता आठवीमधील 54 विदयार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी 14 विदयार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले यामध्ये सिमा करांडे 250 जिल्हात प्रथम,स्वप्नाली सुळ 216,आरोही मदने 208,ज्ञानेश्वरी भैस 204,स्नेहा बुगड 200,आरती भैस 198,संस्कार धायगुडे 194,साक्षी जामदार 190,कृतीका सुळ 184 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ अनिल पाटील, व्हा चेअरमन भगिरथजी शिंदे,मध्य विभागाचे चेअरमन संजीवकुमार पाटील, सहसचिव साळुंखे, इंस्पेक्टर गोडसे ,स्थानिक स्कूल कमीटी, मुख्याध्यापक कापसे सर,पर्यवेक्षीका मोरे मॅडम, सर्व मार्गदर्शक शिक्षक यांचे विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या कडुन अभिनंदन व कौतुक होत आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पत्रकार ,पालक ,शिक्षक यांच्या उपस्थितीत यशस्वी विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. फोटो - कर्मवीर भाऊराव पाटील विदयालयातील शिष्यवृत्ती धारक विदयार्थी समवेत मुख्याध्यापक कापसे ,मार्गदर्शक शिक्षक,पालक व विदयार्थी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा