शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करताना 'सिबिल स्कोअर' विचारात घेतले जाणार नाही....
सहकार मंत्री ना.अतुल सावे यांचे आ. बबनदादा शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर....
बेंबळे। प्रतिनिधी। राज्यातील व्यापारी व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करताना सिबिल स्कोअर विचारात घेतला जाणार नाही असे प्रतिपादन सहकार मंत्री नामदार अतुल सावे यांनी आमदार बबनदादा शिंदे यांनी विधानसभेत विचारलेल्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना केले आहे.
सविस्तर माहिती अशी की भारतीय रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या सूचनानुसार व्यापारी बँका व राष्ट्रीयकृत बँकांच्या धोरणामध्ये शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करताना सिबिल अर्थात क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया लिमिटेड चा निकष लागू केला जातो. परंतू गारपीट, वादळी वारे, अतिवृष्टी, किंवा अवर्षण तसेच पिकावरील रोगराई या नैसर्गिक आपत्तीमुळे बहुतांश शेतकऱ्यांना बँकेकडून घेतलेले पीक कर्ज फेडू शकता येत नाही व नवीन कर्ज घेण्यास शेतकरी सिबिल स्कोअर मुळे अपात्र ठरवले जातात व यामुळे शेतकरी चोहोबाजूनी प्रचंड अडचणीत येतो, या दृष्टीने शेतकऱ्यांना रास्त न्याय देण्यासाठी सिबिलची अट रद्द करणे विषयी शासन काय कार्यवाही करणार आहे ? असा लेखी प्रश्न आमदार बबनदादांनी विधानसभेत विचारलेला होता.
आमदार बबनदादांच्या प्रश्नावर उत्तर देताना सहकार मंत्री नामदार अतुल सावे लेखी उत्तरात म्हणाले की रिझर्व बँक व नाबार्डच्या सूचनेनुसार राष्ट्रीयकृत व व्यापारी बँका शेतकऱ्यांना यापुढे कर्जपुरवठा करताना सिबिल स्कोर तपासणी केली तरी नैसर्गिक आपत्तीमुळे येणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणीचा विचार करून कर्ज मंजुरीचा विचार करते आहे.
चौकट....
.. जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी विशेषबाब...
सहकार मंत्री अतुल सावे पुढे म्हणाले की नैसर्गिक आपत्ती प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेती कर्जाचे मध्यम मुदत कर्जात पुनर्गठण करण्यात येत असून संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज पुरवठा करण्यात येतो आहे व सदर कर्ज पुरवठा करताना कोणतीही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संबंधित शेतकऱ्याच्या सिबिल स्कोर चा विचार करत नाही व पुढेही करणार नाही.
आमदार बबनदादा शिंदे
माढा विधानसभा मतदारसंघ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा