Breaking

बुधवार, १८ जानेवारी, २०२३

श्रीगोंद्यात लिंबू व्यापार्यांची लिंबु बाजारात एकाधिकारशाही...


श्रीगोंद्यात लिंबू व्यापार्यांची लिंबु बाजारात एकाधिकारशाही...



श्रीगोंदा:नितीन रोही
      तालुक्यातील लिंबु हे संपूर्ण देशांबरोबर बाहेरील देशातही प्रसिद्ध आहे या लिंबाची साल आणि त्यात असणारा आंबटपणा हा इतर ठिकाणापेक्षा वेगळाच आहे.गोलाकार व मध्यम आकाराची पिवळी हिरवट लिंबु हे श्रीगोंदेकरांची लिंबाची शान आहे.या लिंबाला जिओ टॅगींग मिळणेसाठी प्रयत्न चालु आहेत तसेच लिंबु उत्पादक यांना एकत्रित करुन लिंबापासुन विविध पदार्थ बनविण्यासाठी एक अवलिया रात्र दिवस कष्ट करत आहे .फार मोठा संघर्षातुन लिंबु उत्पादक यांना न्याय देण्याचा प्रयत्न चालु असताना आता स्थानिक लिंबु व्यापार्यांच्या एकाधिकारशाहीला तोंड देत आहे.
कृषि उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा येथे लिंबाचे बाजार भाव जो तो आडतीवाला रोज टाकत असतो जेणे करून शेतकय्रांना समजेल की आज काय बाजार आहे त्यानुसार शेतकरी आपल्या लिंबाची विक्री कोणाच्या अडतीवर करायाची हे ठरवत असतो .
  सोमवार असल्याने लेबर बाजारात आठवड्याचा भाजीपाला आणण्यासाठी गेले असता काही व्यापारी बांधवांनी या आडतीवरचा व्हिडीओ अपलोड करत ही आडत बंद आहे त्यांनी जाहीर केलेले दर ते देणार नाही असे परस्पर सांगत आपल्या आपल्या ग्रुपवर हा स्टेटस ठेवत अडतीवाल्याची बेइज्जत करण्याचा काही व्यापारी मंडळीनी प्रयत्न केला आहे.तसेच मोशी येथील व्यापारी बाबा कोळपे यांनी स्वतः चा व्हिडीओ व्हायरल करत गोरख आळेकर यांची बदनामी करण्याचे काम केले आहे .याबद्दल मंगळवार दिनांक १७/०१/२०२३ रोजी त्या व्यापार्यांवर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
 वास्तविक पाहता रोज लिंबाचे दररोजचे ताजे अपडेट गोरख आळेकर यांनी तयार केलेल्या लिंबु उत्पादक ग्रुपच्या माध्यमातुन लिंबु उत्पादक शेतकरी बांधवांनपर्यंत ही माहिती दिली जाते ही सेवा गेली ३-४ वर्षे पासुन रोज चालू आहे.या ग्रुप मुळे लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला लागला आहे.येथून मागे शेतकर्यांच्या लिंबाला कवडीमोल भाव देऊन शेतकर्यांची पिळवणुक केली जात होती या ग्रुपच्या माध्यमातून लिंबु उत्पादक शेतकर्यांमध्ये जनजागृती होऊन चांगला बाजारभाव शेतकर्यांचा हातात पडतं आहे .लिंबु उत्पादकाची  संख्या जवळपास ४०००० इतकी असून रोज बाजारभाव व्हाटस अपच्या माध्यमातून दिले जातात.या ग्रुपमध्ये श्रीगोंदा तालुका व्यतिरिक्त कर्जत ,जामखेड, पंढरपूर,मोहळ,आंकुर्ली,करमाळा,अकोले,वाडेगाव,परभणी,नांदेड, जळगाव,बीड , औरंगाबाद,पुणे,नाशिक, कर्नाटक,विजापुर,इंडी, आंध्रप्रदेश,गुटटुर,तामीळनाडु, मध्यप्रदेश,गुजरात,राजस्थान येथील लिंबु उत्पादक शेतकऱ्यांना रोजचे बाजारभावाचा मेसेज जात असतो. या मेसेजचा जो दर आहे तोच थोड्या फार फरकाने लिंबू उत्पादक शेतकर्यांना भाव मिळत असतो .या मेसेजमूळेच मागच्या वर्षी लिंबु बाजार भाव २०० पार केले होते आणि आता यावर्षी ही चांगला बाजारभाव लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार असे चित्र दिसताच स्थानिक व्यापार्यांनी गुप्तपणे एकत्र येत  बैठक घेत लिंबू उत्पादक ग्रुप वर  मेसेज काहीही आला तरी आपली खरेदी कमी भावाने करत आपल्याला जास्तीत जास्त नफा कसा होईल याच्याकडेच लिंबु व्यापार्यांचा  कल आहे .सर्व व्यापारी एक होत लिंबाची आडत बंद करण्याचा दबाव टाकत कालपासून लिंबु आडत या व्यापार्यांच्या दबावापोटी बंद‌ असल्याचे गोरख आळेकर यांनी सांगितले.तसेच लवकरच नव्या स्वरूपात लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकरी ते ग्राहक या पध्दतीने सामुहिक काम करून लिंबु उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणार आहे.
आजही तुम्ही स्वतः ऑनलाईन चेक करा शहरात लिंबाचे काय आजचे दर काय आहेत ? एका लिंबाची किंमत ५ रूपये पेक्षा कमी नाही एका किलोत मिडीयम आकाराची ३० लिंबू बसतात तर एका किलो लिंबाचे  ग्राहक १५० रूपये देतात तर जो शेतात ऊन वारा पाऊस,हाताला,पायाला संपुर्ण शरिरात काटा  टोचतो त्या काबाड कष्ट करणार्याला बळीराजाच्या हातात  किती पैसे मिळतात ? वाहतुक खर्च , व्यापारी यांचे कमिशन ,लोकल विक्री करणारे यांचा वाटा जाऊनही जो शिल्लक पैसा राहतो त्यातील निम्माच पैसा शेतकर्यांना मिळाला तरी आताच्या परिस्थितीत ५० रूपयापेक्षा जास्त पैसे आज शेतकर्यांना बाजारभाव‌ मिळवु शकतो.आज मागणी जास्त नाही परंतु बागेत मालच शिल्लक नाही त्यामुळे कमी माल आणि बाजार कमी यामुळे लिंबू उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
याचा विचार स्थानिक व्यापार्यांसह शहरातील व्यापार्यांनी करावा व जास्तीत जास्त लिंबाचा बाजारभाव हा माझ्या लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे म्हणुन कायम  संघर्ष करणार आहे  सोमवार दिनांक २३/०१/२०२३  रोजी सकाळी १० वाजता लिंबू उत्पादक शेतकरी बांधवांशी‌ संवाद साधत पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे असे प्रतिपादन गोरख आळेकर यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा