*तुळजापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 22 फेब्रुवारी रोजी चक्काजाम आंदोलन, जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांची माहिती*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
तुळजापूर -शेतीला दिवसा दहा तास वीज पुरवठा करण्याचा मागणी साठी बुधवार दि २२रोजी दुपारी १२वा येथील जुन्या बस स्थानकासमोरील महामार्ग चौकात स्वाभीमानीशेतकरीसंघटना वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहीती जिल्हाअध्यक्ष रविंद्र इंगळे यांना दिली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ . राजु रोजी यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात येत आहे.
कृषी पंपाचे बेकायदेशीर रित्या विज खंडीत करुन पठाणी वसुली करण्याचा सपाटा लावलेला आहे तरी तो बंदकरुन . दिवसा 10 तास पुरेशा दाबाने वीज द्यावी न्यायालयाने निकाल निकालाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच अन्न सुरक्षा कायद्यानुसार चालु पिकाच्या पंपाची विज खंडीत करुन नये . अतिवृष्टी व पिक विम्याचे पैसे त्वरीत खात्यावर जमा करावे . सरकारने कांदा 30 ते 50 रु . किलोने खरेदी करावा हरभरा व तुर केंद्र हमीभाव केंद्र त्वरीत चालु करावे नियमीत कर्ज फेडणाऱ्यांना प्रोत्साहनप्रत अनुदान लवकर जमा करावे सोयाबीन 8 ते 10 हजार किंटल प्रमाणे खरेदी करावे . बुलढाणा शेतकरी आंदोलकांन वर झालेल्या लाटी हल्याची चौकशी करुन दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा