Breaking

रविवार, १९ फेब्रुवारी, २०२३

टेंभुर्णी येथील ब्रह्माकुमारी ईश्वरीय केंद्रामध्ये उत्साहाने महाशिवरात्री उत्सव संपन्न ....




टेंभुर्णी येथील ब्रह्माकुमारी ईश्वरीय केंद्रामध्ये उत्साहाने महाशिवरात्री उत्सव संपन्न ....


बेंबळे ।प्रतिनिधी                  
                   
                       प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या टेंभुर्णी केंद्रामध्ये  शिवरात्री महोत्सव उमंग उत्साहात संपन्न करण्यात आला. यानिमित्त सकाळी सात वाजता 'ज्ञान -मुरली 'वाचन करण्यात आले, त्यानंतर व्यासपीठावरील प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले ,याप्रसंगी राजयोगिनी शिवरात्री बेहेन, अनिता बेहेन, अश्विनी बेहेन माजी आमदार विनायकराव पाटील, बेंबळे जिल्हा परिषद सदस्य बंडूनाना ढवळे, दत्तात्रयमहाराज चव्हाण, डॉक्टर पावले, टेंभुर्णीचे सरपंच प्रमोद कुटे, शिवसेना शहर प्रमुख भाऊ देशमुख, नागेश खटके आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 


          यानंतर महाशिवरात्रीचे आध्यात्मिक रहस्य सांगताना राजयोगीनी शिवरात्री बेहेन म्हणाल्या की शिव परमात्म्याचे आगमन हे रात्री होते ,म्हणजेच कलियुगाच्या घोर अंधकारात परमात्मा या विश्वावरील आत्म्याला राजयोगाच्या शिक्षणाद्वारे यशस्वी जीवन व्यतीत करण्याचा व मनःशांती चा लाभ मिळवून देण्यासाठी या पृथ्वीवर अवतारित होत आहे. काम ,क्रोध ,लोभ, मोह, माया अहंकार हे मानवी जीवनाचे मुख्य शत्रू असून प्रपंचात गृहस्थी आयुष्य जगत असताना या सहा दुर्गुणावर विजय मिळवून जीवनात शांती, प्रेम, सद्भावना,आनंद ,सहनशीलता व सदवर्तन प्राप्त करून समाधानी, शांत ,आनंदी व सद्गुणी जीवन जगण्याचा मार्ग राजयोगाद्वारे आत्मसात करता येतो, व म्हणूनच महाशिवरात्र म्हणजे शिवपरमात्मा यांची जयंती असून परमात्म्याचे याप्रसृष्टीवर अवतरण झाले आहे व याची अनुभूती घेऊन जीवन यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने मेडिटेशन अर्थात राजयोगाचे शिक्षण घेणे खूप महत्त्वाचे आहे . आपल्या प्रत्येकाच्या देहात आत्मारूपी चैतन्य शक्ती आहे ,आपणा सर्वांचे लौकिक पिता वेगवेगळे असले तरी अलौकिक पिता मात्र  एकमेव परमात्मा आहे, व म्हणूनच आपण एकमेकांचे आत्मिक बहीण-भाऊ आहोत, या विद्यालयातील अध्यात्मिक ज्ञानासाठी सेवा केंद्रांची दारे सर्वासाठी नेहमी खुली आहेत .  या ईश्वरीय विद्यालयाची हजारो केंद्रे व उपसेवा केंद्रे देशात व परदेशात स्थापन झालेली असून 30 ते 40 लाख बंधू-भगिनी यातील आध्यात्मिक ज्ञानाचे अनुकरण करून यशस्वी जीवन व्यतीत करत आहेत .याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य बंडूनाना ढवळे यांनीही आपले विचार व्यक्त करून सध्याच्या धकाधकीच्या वादळी व अस्थिर जीवनात ईश्वरीय विश्वविद्यालयातील अध्यात्मिक ज्ञान प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे व प्रत्येकाने मनःशांतीसाठी व जीवनात यशस्वी होण्यासाठी राजयोगाचा अभ्यास केला पाहिजे असे प्रतिपादन केले.


        यानंतर माजी आमदार विनायकराव पाटील, प्रमोद कुटे दत्तात्रय चव्हाण बंडूंनाना ढवळे या मान्यवरासह प्रमुख बेहेनजींच्या हस्ते 
शिव - ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सजवलेल्या ट्रॅक्टर वरती शिवलिंग प्रतिमा ठेवून , मोटर सायकल ला परमात्म्याचे ध्वज बांधून बंधू-भगिनींनी टेंभुर्णी शहरातून मोठी मोटर सायकल रॅली काढली. शहरात अनेक ठिकाणी या रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले.  
    सूत्रसंचालन राजयोगिनी गोदावरी बेहेन यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजयोगीनी अनिता बहन, सायली बेहेन भ्राता सुभाष चव्हाण, विलास चव्हाण ,भरगंडेभाई , खळदकर आदी मान्यवरांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमास टेंभुर्णी ,बेंबळे, अकोले बुद्रुक, शिराळ, भिमानगर, माळीनगर ,कुर्डूवाडी ,पिंपळनेर, शेवरे आदी ठिकाणचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसाद वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा