Breaking

शुक्रवार, १० मार्च, २०२३

सिना-माढा सिंचन योजनेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले 50 कोटी रुपये मंजूर... ....... आ. बबनदादा शिंदे


सिना-माढा सिंचन योजनेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले 50 कोटी रुपये मंजूर...
                      .......  आ. बबनदादा शिंदे 

बेंबळे ।प्रतिनिधी।        
 .... ना. देवेंद्र फडणवीस आ. बबनदादा शिंदे
           व सिना माढा सिंचन योजना     
               नुकत्याच जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये माढा तालुक्याची भाग्य जलवरदाईनी असलेल्या सीना- माढा सिंचन योजनेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 कोटी रुपये मंजूर  केले असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार देवेंद्रजी फडणीस यांच्याकडे माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी या योजनेसाठी निधीची मागणी केली होती व सातत्याने  पाठपुरावा केला होता. 
             सविस्तर वृत्तांत असा की संपूर्ण महाराष्ट्रात उत्कृष्ट नियोजन असलेली माढा तालुक्यातील सीना माढा सिंचन ही योजना 2004 साली मंजूर होऊन  कामास सुरुवात झाली. पुढे टप्प्याटप्प्याने माढा तालुक्यात या योजनेच्या कालव्याचे जाळे पसरले व याद्वारे सध्या 16हजार हेक्टर (चाळीस हजार एकर) क्षेत्र ओलिताखाली येत असून ओढे, नाले, विहिरी,तळी यांना या योजनेमुळे कधीच पाणी कमी पडत नाही. आमदार बबनदादा शिंदे यांचे कुशल नेतृत्व व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्या मार्फत योग्य प्रकारे होत असलेल्या नियोजनामुळे सीनामाढा सिंचन योजना यशस्वीपणे कार्यरत झालेली असून चाळीस हजार एकर लाभक्षेत्रामध्ये हरितक्रांती होत असल्याचे दिसून येते. यामुळे शेतकरी व शेतमजुराचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे तर अनेक लहान मोठ्या उद्योगांना चालना मिळून हजारो हातांना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे, तसेच शेतीपूरक उद्योग धंद्याला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाल्याचेही दिसून येत आहे.
          मंजूर झालेल्या निधीमधून सिना माढा सिंचन योजनेच्या मुख्य कालव्याच्या 'लायनींगचे' काम प्रामुख्याने करण्यात येणार आहे, याचप्रमाणे भूसंपादन तसेच मोडनिंब विभागातील सोलंकरवाडी, जाधववाडी ,वैरागवाडी आदी ठिकाणच्या पोट कालव्याची कामे तत्परतेने केली जाणार आहेत. अनेक ठिकाणी कालव्याचे गेट्स (दरवाजे )खराब झाले आहेत ते बदलणे आहे तर अत्यावश्यक ठिकाणी नवीन गेट्स बसवण्याचेही नियोजन आहे अशी माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे.
       साखर कारखान्याच्या उत्कृष्ट नियोजनामुळे या योजनेचे वीज बिल कधीही थकीत राहिलेले नाही, तसेच मशिनरी दुरुस्ती किंवा पाईपलाईन लिकेज दुरुस्त्या यासाठी कारखान्याची यंत्रणा नेहमी सज्ज असते. सध्या या योजनेतून उन्हाळी आवर्तन सुरू असून तालुक्यातील 40 हजार एकर  क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यात येत आहे यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा