Breaking

शुक्रवार, १७ मार्च, २०२३

बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालय धरणे आंदोलन.



बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालय धरणे आंदोलन.



प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.



दिनांक 16  मार्च 2023 वार गुरुवार रोजी बहुजन रयत परिषद या संघटनेच्या वतीने माननीय संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आदरणीय लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब. यांच्या मार्गदर्शनाखाली व बहुजन परिषद प्रदेशाध्यक्ष रमेश तात्या गालफाडे व महिला प्रदेशाध्यक्ष कोमलताई साळुंखे. यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता


. या कार्यक्रमासाठी संपूर्ण बीड जिल्ह्यातील बहुजन रयत परिषदेचे कार्यकर्ते असंख्य संख्येने उपस्थित होते .या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10. वाजता सुरू करण्यात आली.  बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  सभा मंडपामध्ये बहुजन रयत.परिषद असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन संबंधांमध्ये आपले मनोगत.. श्री अशोक बप्पा सोनवणे .संपर्कप्रमुख मराठावाडा. श्री गुरव मोमीन बीड जिल्हाध्यक्ष. श्री लालासाहेब शिंदे सामाजिक कार्यकर्ते. श्री महेश धुरंदरे तालुकाध्यक्ष गेवराई.श्रीमती सुभेद्रा बाई थोरात सामाजिक श्री रमेश पाटोळे जिल्हाध्यक्ष ग्रामीण बीड.

श्री. ईश्वर क्षीरसागर प्रदेश सरचिटणीस.
  श्री रमेश तात्या गालफाडे .प्रदेश अध्यक्ष बहुजन रयत परिषद .यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री रमेश तात्या गालफाडे. यांनी खालील प्रमाणे मागण्या मांडल्या .
/1/मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी.अ.ब.क.ड. आरक्षणाची वर्गीकरण करण्यात यावे.2/ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ. मार्फत मातंग समाजातील लोकांना वाटपकेलेले कर्ज माफ करण्यात यावे. .3/ लोकांना दिलेल गायरान संदर्भामध्ये 2010 पूर्वी जी गायरान जमिनी सरकारने लोकांना वाटप केलेले आहेत. 1.e च्या.रजिस्टरला गायरान धारकांची नोंद करण्यात यावी. 4/.तसेच बीपीएल कार्डधारकांना शासनाने प्रत्येकी पाच किलो गहू तांदूळ सरसकट देण्यात यावे.5/ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न किताब देण्यात यावा.6/ गेल्या 30 वर्षापासून लहुजी साळवे आयोगाची स्थापना करण्यात आली परंतु त्याची अंमलबजावणी करण्यात यावी.
7/ आणि संगमवाडी येथील आद्य क्रांतिक गुरु लहुजी साळवे यांचे स्मारक तात्काळ भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात यावी अशा प्रकारच्या  मागण्या मांडण्यात आल्या .त्याचं निवेदन दुपारी.3 वाजता सर्व कार्यकर्त्यांचे मनोगत व्यक्त केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या मागण्यांचा पाठपुरावा तात्काळ करण्यात यावा. या मागण्या वेळे त सरकारने पूर्ण केल्यास  या पुढील काळामध्ये बहुजन रयत परिषदेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारचे तीव्र स्वरूपामध्ये आंदोलन करण्यात येईल. या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही तर .लोकशाही मार्गाने .आंदोलन अशा प्रकारचे आंदोलन . रस्ता रोको. जेलभरो आंदोलन करण्यात येईल असे प्रदेशाध्यक्ष श्री रमेश संध्याकाळकडे यांनी आपल्या भाषणातून विचार व्यक्त केले. यावेळी बीड जिल्ह्यातील बहुजन विकास परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने हजर होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा