विरोधकांनी राजकीय पातळी सोडली- संजय कोकाटे
सर्वपक्षीय परिवर्तन आघाडीची विचार विनिमय सभा टेंभुर्णी येथे संपन्न*
टेंभुर्णी (प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समिती कुर्डूवाडीच्या प्रचाराची सर्वपक्षीय परिवर्तन आघाडीची सभा ओम साई मंगल कार्यालय, अकलूज चौक, टेंभुर्णी येथे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीखाली आज दुपारी संपन्न झाली.
प्रचाराच्या रणधुमाळी दरम्यान शिवसेनेचे माढा लोकसभा संपर्कप्रमुख संजय कोकाटे बोलत होते. यावेळी कोकाटे यांनी आमदार बबनदादा शिंदे, रणजीत शिंदे तसेच आमदार संजय मामा शिंदे यांचा खरपूस समाचार घेतला. 1995 सालापासून ते आज पर्यंत सहा वेळा निवडून आलेले आमदार साधे राज्यमंत्रीही होऊ शकत नाहीत कारण तुम्ही निष्ठावंत राहिला नाही. 1995 मध्ये शिवसेनेची तेथून पुढे पंधरा वर्षे काँग्रेस राष्ट्रवादीशीनंतर भाजपशी घरोबा करून आपला भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न सतत करीत असत. त्यामुळे तुम्ही राजकारणातली पातळी सोडली आहे असे मत कोकाटे यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की माढा तालुक्याबरोबर करमाळा तसेच परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांचा अनेक पद्धतीने भ्रष्टाचार करून शेअर्सचे पैसे गोळा केले. कारखाना विकून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. शेतकऱ्यांच्या शेतीच्या भाजीपाल्याला दर मिळू नये म्हणून कुर्डूवाडीत आपला मॉल उभा केला. साडेतीनशे ते चारशे कोटी चा भ्रष्टाचार 20 हजारापर्यंतचे शेअर्स घेऊन तुम्ही केले शेतकऱ्यांचे सिबिल खराब केले. विठ्ठलगंगा प्रोडूसर भाड्यावर देऊन भाडे घेत बसले. मार्केट कमिटीच्या गळ्यातील भ्रष्टाचार दूधडेरीच्या जागेत ग्रामपंचायतच्या जागेत अनेक ठिकाणी जागा बळकावून अनाधिकृत बांधकाम करून लोकांना लुटले. अशा प्रकारची राजकारण हे लाचारीयुक्त राजकारण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. याचबरोबर अनेक प्रश्नावर त्यांनी आपली विवेचन मांडले.
यावेळी अतुल खूपसे म्हणाले की जनावराचा बाजार बंद करून शेतकऱ्यांचे हाल सुरू केले. संजय मामांना करमाळामध्ये उंदीरमामा म्हणून संबोधले जाते. सावंत बंधूंनी आणलेली शिवजल योजना त्याला विरोध करण्याचं कार्य या शिंदे बंधूंनी केले. नवीन भागात शेतकरी सापडला की त्याच्या आधार कार्डावर पॅन कार्डवर कर्जाचा बोजा चढविणे असे अनेक उद्योग या शिंदे बंधूंनी केले आहे. करमाळ्यातील विक्रम शिंदे यांनी शेतकऱ्यांची एफआरपी रक्कम दिली नाही. संजयमामा,रणजीत शिंदे, विक्रम शिंदे, धनराज शिंदे यांनी माढा, म्हैसगाव, करमाळा, मानेगाव अशा अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांची सिबिल खराब करण्याचे दरोडेखोरासारखे काम या शिंदे बंधनी केले आहे. मागील एका सभेत दादा म्हणाले की माढा तालुका सुजलाम सुफलाम झाला. उसाशिवाय दुसरं पीक शेतकरी घेऊ शकत नाहीत. का? तर पाणी भरपूर उपलब्ध झाले आहे. परंतु कारखाना व कारखाना परिसरात भोवतीच फक्त पाणी आहे. माढ्यातला आणखीन बराचसा भाग दुष्काळग्रस्त आहे. त्या भागात पाणी नाही. दूध संघासमोरील गाड्याचे बांधकाम, हॉटेलचे अतिक्रमण या अशा दोन नंबरच्या कामाने शिंदे बंधूंचे भूत माढा तालुक्यावर बसले आहे. त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी सर्वांनी परिवर्तन विकास आघाडीला साथ देऊन सर्व उमेदवार विजयी करण्याचे आवाहन जनशक्तीचे अतुल भाऊ खूपसे यांनी केली आहे.

यावेळी शिवाजी सावंत म्हणाले की 2004 सालापासून मी आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधात काम करत आहे. तीन वेळा आमदारकीला विरोध केला. शिंदे बंधूचे नेतृत्व कसे आहे हे स्वतःच्या स्वार्थापोटीचे नेतृत्व आहे. रस्ता, हॉस्पिटल, शिक्षण, संडास, मोठमोठ्या शहरांमध्ये गावामध्ये बाजार तळावर महिलांसाठी पुरुषांसाठी मुतारीची साधी सोय सुद्धा यांना करता आली नाही. म्हणून कृषी उत्पन्न समितीतील मार्केट कमिटीस गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी, उजनी धरणातील मासे बाहेर विक्रीसाठी जातात त्यासाठी टेंभुर्णी मच्छी मार्केट सुरू करण्यासाठी, केळी उत्पादकाच्या खरेदी विक्रीसाठी, मोडनिंब आवारात मिरची, कांदा, बोरे, टोमॅटो, बेदाणा यांचे मार्केट सुरू करण्यासाठी कुर्डूवाडी व मोडनिंब मधील जनावराच्या बाजार पूर्वीप्रमाणे सुरू करण्यासाठी, गाळे धारकाचे भाडे 75% कमी करण्यासाठी, सर्वपक्षीय परिवर्तन आघाडीला भरपूर मतांनी निवडून द्यावे असे आवाहन सावंत यांनी केले. अशा स्वरूपाची राजकारण हे सत्तेत असलेली लोकं करत आहेत. यावेळी सुहास पाटील, योगेश बोबडे, शिवाजीराजे कांबळे याचबरोबर अनेक जणांचे भाषणे झाली.
या कार्यक्रमास सोलापूर जिल्हा शिवसेनेचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, माढा लोकसभा संपर्कप्रमुख संजय कोकाटे, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष इंदलकर पाटील, शिवाजीराजे कांबळे, संभाजी ब्रिगेड चे सचिन जगताप, रयतेचे सुहास पाटील, जनशक्तीचे अतुल खूपसे, पोपट अनपट, प्रशांत गिड्डे, औद्योगिक प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल जगदाळे, मनसेचे माऊली सलगर, मुन्ना साठे,चांदज चे राजाभाऊ टकले, वैभव मोरे,नागेश बोबडे, तानाजी गाडे,रोहित चव्हाण, योगेश पाटील, तात्यासाहेब गोडगे, जयवंत पोळ, सुधीर महाडिक, औदुंबर महाडिक, राहुल चव्हाण, गिरीश ताबे, भारत पाटील, संजय पाटील घाटणेकर, नागनाथ वाघे, राहुल चव्हाण, विनोद पाटील, शिवाजी सुर्वे, विनायक केचे, भारत गायकवाड, प्रवीण पाटील, शिवाजी पाटील, परीक्षेत पाटील, संतोष पाटील, संतोष तांबे, सतीश चांदगुडे, धर्मराज मुकणे, ज्ञानदेव सलगर, हरिभाऊ सटाले, बापू वाघे, राहुल टिपाले, ज्योतीताई कुलकर्णी, भाऊ पाटील, टेंभुर्णी परिसरातील सर्व ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटीतील चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य, व्यापार मतदारसंघातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा