Breaking

गुरुवार, ११ मे, २०२३

सोलापूर शहरासाठी धरणातून 6 हजार क्यूसेक्स ने पाणी सोडण्यास प्रारंभः.. 21 मे पर्यंत पाणी चालू राहणार... धीरज साळे


सोलापूर शहरासाठी धरणातून 6 हजार क्यूसेक्स ने पाणी सोडण्यास प्रारंभः..
 21 मे पर्यंत पाणी चालू राहणार..........  धीरज साळे

 सोलापूर साठी समांतर पाईपलाईन तातडीने व्हावीः 14 टीएमसी पाण्याची होईल बचत.....

******/******************************

AJ 24Taas News Maharashtra

बेंबळे।प्रतिनिधी। /   मुकुंद रामदासी बेंबळे

               सोलापूर शहराला पिण्यासाठी आगामी दहा ते पंधरा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा औंज आणि चिंचपूर बंधाऱ्यात शिल्लक असल्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीत तातडीने पाणी सोडण्यात यावे अशा मागणी आशयाचे पत्र सोलापूर महानगरपालिका आयुक्तांच्या वतीने मिळाल्यामुळे उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी कमी पडू नये म्हणून 11 मे 23 पासून धरणाच्या चार दरवाज्यातून 6 हजार क्यूसेक्स पाणी सोडण्यास प्रारंभ केला आहे, हे पाणी 232 किलोमीटर प्रवाही अंतर पार करून औंज आणि चिंचपूर बंधाऱ्यात 20 मे पर्यंत पोहोचेल व 21 मे पासून धरणातून पाणी सोडणे बंद करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा सोलापूर विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली आहे .या पाण्यामुळे पंढरपूर सांगोला मंगळवेढा आदी शहरासहित भीमा नदी काठावरील शेकडो गावे व वाड्यावस्त्यांना ऐन कडक उन्हाळ्यात पिण्यासाठी व शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.
        वृत्तांत असा की 5 मे 23 रोजी दुपारी बारा वाजता उजनी धरणातील पाणी पातळी 'मायनस' (-उणे) मध्ये गेली आहे ,त्यामुळे सध्या धरणात मायनस (-उणे) -3.60 %पाणीसाठा आहे, तर मृतसाठ्यातील 61 टीएमसी पाणी अद्याप शिल्लक आहे. धरणातून कालव्यात 3000 क्यूसेक्स व बोगद्यात 500 क्यूसेक्स  विसर्ग चालू असून सिनामाढा व दहीगाव सिंचन योजना बंद झाल्या आहेत. 20 मे पर्यंत कालव्यातून विसर्ग चालेल परंतु  बोगदा मात्र दोन - तीन दिवसात बंद होईल .त्याचप्रमाणे धरण नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार अद्याप पर्यंत धरणातून 14 टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे व यावर्षीच्या अति उष्णतेमुळे या बाष्पीभवनचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या भीमा नदीतील 14 व सीना नदीतील 17 बंधाऱ्यात पाणी आहे परंतु 15 ते 20 जून पर्यंत  संपूर्ण जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्यास शेतीसाठी व पिण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक व पशुधनांला जबरदस्त पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे हे निश्चित .

सोलापूर साठी समांतर पाईपलाईन तातडीने होणे काळाची गरज......... धीरज साळे 


          सोलापूर शहराला पाणी कमी पडू नये म्हणून समांतर पाईपलाईन चे काम संथ गतीने चालू आहे, परंतु हे काम तातडीने होणे आवश्यक आहे ,कारण सोलापूर शहराला उजनी धरणातून प्रत्येक वर्षी किमान सतरा ते अठरा टीएमसी पाणी सोडावे लागते व समांतर पाईपलाईन मधून पाणीपुरवठा केल्यास सोलापूर शहराला दोन्ही वेळेस मुबलक प्रमाणात पाणी मिळेल व 13 ते 14 टीएमसी पाण्याची बचत होणार आहे व यामुळे उजनी धरणातील पाणी , जरी पाऊस कमी पडला तरी प्रत्येक वर्षी जुलै अखेरपर्यंत पिण्यासाठी व शेतीसाठी निश्चित पुरणार आहे. मागील चार वर्षात मुबलक प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे पाण्याची टंचाई सहसा दिसून येत नाही परंतु पावसाने धोका दिल्यास उदाहरणात अपेक्षित टक्केवारी पर्यंत पाणीसाठा न झाल्यास आगामी काळाचा विचार करता समांतर पाईपलाईन होणे व उजनी लाभक्षेत्रातील सात ते साडेसात लाख एकर बागायती क्षेत्राला  रीतसर पाणी मिळणे काळाची गरज निर्माण होणार आहे व म्हणून सोलापूर साठी समांतर पाईपलाईन तातडीने होणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा