*भिम-अण्णा सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन*
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.
दिनांक:-०९/०५/२०२३ रोजी जिल्हाधिकारी साहेब धाराशिव.व तुळजापूर तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले या निवेदनात केज येथे मातंग समाजाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत तसेच त्या मुलीस न्याय मिळवून देणे बाबत निवेदन देण्यात आले.
मातंग समाजाची गरीब कुटुंबातील १६ वर्षाची निरागस अल्पवयीन मृतक मुलगी नाव- कु. वर्षा जयराम आमटे राहणार बानायत (गाव )तालुका- दारव्हा जिल्हा यवतमाळ ही तिच्या वडिलांसोबत तीन महिन्यापूर्वी कर्नाटका येथे ऊस तोडीच्या कामासाठी गेली होती. परंतु मुकादम सुशील बांगे याने येथील काम संपले आता माझ्या गावी चला तेथे काम आहे असे खोटे सांगून ८ दिवसापासून तालुका केज जिल्हा बीड येथील त्यांच्या शेतात हे गरीब कुटुंब पोट भरण्यासाठी येथे आले असता अल्पवयीन मुलीवर लक्ष ठेवून बसलेला आरोपी सुशील बांगे यांनी त्या अल्पवयीन मुलीला त्याच्या राहत्या घरी नेले दिनांक :- ५ मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला व नंतर तिच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले व गळा दाबून तिची निघृण हत्या केली. व नंतर तिच्या मृतदेह शेतातील विहिरीमध्ये नेवून फेकून दिला. कु. वर्षा आमटे तिची गळा दाबून निघृण हत्या केल्या प्रकरणाचा भिम - अण्णा सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहीर निषेध करून तेव्हा कलम ३०२,३७६'३०६, पास्कोअॅक्ट , अनुसूचित जाती जमाती नुसार ॲट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्ह्यगारावर खुनाचा गुन्हा दाखल करून सुशील बांगे या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी सदरील शिक्षा नाही झाल्यास भिम- अण्णा सामाजिक संघटनेच्या वतीने रस्ता रोको अंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने दखल घ्यावी व त्या अल्पवयीन मुलीला न्याय देण्यात यावा व तिच्या कुटुंबाला राज्य शासनाची ५० लाख रुपये मदत देण्यात यावी अशी निवेदनामार्फत धाराशिव जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांना मागणी करण्यात आली. व साहेबांना निवेदन देण्यात आले यावेळी भिम -अण्णा सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष सुरेश (आप्पा )भिसे,तुळजापूर तालुकाअध्यक्ष:- राम(भाऊ) कांबळे , औसा तालुका अध्यक्ष :-मयूर (भाऊ) साळुंके , मुकेश (भाऊ ) सगट, रवी (भाऊ) गायकवाड, विशाल (भाऊ) शेंडगे अदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा