Breaking

शुक्रवार, २६ मे, २०२३

उजनी जलाशयकाठच्या गावांचा पाणी प्रश्नः.. सोलापूरच्या नावाखाली वाया जाणारे पंधरा टीएमसी पाणी मुख्यमंत्र्यांच्या कडून वाचवावे.... धरणातील पाण्याचा विसर्ग सर्व बंद करा म्हणणे म्हणजे अभ्यास न करता स्वार्थी राजकारणासाठी लोकप्रतिनिधींना बदनाम करण्याचे कारस्थान ....सीनेतील बंधारे का भरता म्हणून काढलेला मोर्चा पूर्णपणे चुकीचा.... आमदार बबनदादा शिंदे



उजनी जलाशयकाठच्या गावांचा पाणी प्रश्नः..
 सोलापूरच्या नावाखाली वाया जाणारे पंधरा टीएमसी पाणी मुख्यमंत्र्यांच्या कडून वाचवावे..


.. धरणातील पाण्याचा विसर्ग सर्व बंद करा म्हणणे म्हणजे अभ्यास न करता स्वार्थी राजकारणासाठी लोकप्रतिनिधींना बदनाम करण्याचे कारस्थान
 
सीनेतील बंधारे का भरता म्हणून काढलेला मोर्चा पूर्णपणे चुकीचा....
                         आमदार बबनदादा शिंदे

 बेंबळे ।प्रतिनिधी              उजनी धरण व
                          आ. बबनदादांचा फोटो             

                उजनी जलाशयातील पाण्याचा साठा उन्हाळ्यात देखील भरपूर राहावा व जलाशयकाच्या गावाला पाणी कमी पडू नये असे वाटत असेल तर जलाशयातील पाणी पातळीचा चांगला अभ्यास करावा, सोलापूर शहराच्या नावाखाली वाया जाणारे 15 टीएमसी पाणी वाचवण्याचा प्रयत्न करावा व सीना नदीवर शिरापूर पर्यंतच बंधारे भरून घेण्यास परवानगी असताना त्याखालील बंधारे देखील भरून घेण्यासाठी खाली  पाणी सोडले जाते हे बंद करण्यायाविषयी  मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे  यांचेकडून प्रयत्न करावेत . पाणी पातळीचा अभ्यास न करता ऐन उन्हाळ्यात भीमा नदी ,कालवा ,सीना माढा,दहीगाव,बोगदा यातील पाणी बंद करा म्हणून शासनाला कळवणे म्हणजे स्वतःच्या क्षुल्लक स्वार्थी राजकारणासाठी लोकप्रतिनिधींना बदनाम करण्याचा प्रयत्न करणे असेच म्हणावे लागेल व तसेच आम्हाला जेवढे हक्काचे आहे तेवढेच पाणी मिळावे याबाबत कोणतीही तक्रार नाही असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन आमदार बबनदादा शिंदे यांनी केले आहे.
            सविस्तर वृत्तांत असा की करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी ऊजनीच्या  पाणीपातळीचा अभ्यास न करता भीमा नदी,कालवा, सीना माढा सिंचन योजना,व भीमा सीना बोगदा यात थोड्या प्रमाणात चालू असलेले सध्याचे पाणी बंद करण्यात यावे अशा प्रकारचे निवेदन शासनाकडे देऊन स्वतःच्या क्षुल्लक स्वार्थासाठी पाण्याचे राजकीय भांडवल केले असल्याचे दिसून येत असून ऐन उन्हाळ्याच्या कडक उष्णतेमध्ये शेतकऱ्याची पिके जळली तरी चालतील पण सर्व ठिकाणचे पाणी बंद करण्यात यावे  अशी मागणी करणाऱ्या नारायण आबा पाटील यांचे  विषयी अतिशय संतापजनक आणि तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
          सविस्तर वृत्तांत असा की उजनी धरणात पावसाळ्याच्या अखेरीस 497. 817 मीटर पाणी पातळी ठेवण्यात येते ,या वेळी धरण 111. 21% भरलेले असते व त्यामध्ये 123.28 टीएमसी पाणीसाठा असतो.  प्रत्येक  वर्षाच्या 15 ऑक्टोबर नंतर धरणातील उजनी जलाशयातील या पाण्याचा वापर पिण्यासाठी शेतीसाठी एमआयडीसी साखर कारखाने पाणीपुरवठा योजना शेकडो उचल पाणी योजना अनेक लहान-मोठे उद्योगधंदे याच्यासाठी केला जातो. धरणातील पाण्याची पातळी 491 मीटर ला येते तेव्हा धरण मायनस(- ऊणे)मध्ये जाते व या पातळीत सिनामाढा सिंचन योजना बंद होते, यावर्षी देखील पाच मे 23 पासून सीना माढा बंद झालेली आहे, तसेच 488 मीटर पर्यंत पाणी पातळी  खाली जाते तेव्हा कालव्याचा दरवाजातुन फक्त दोनशे किंवा तीनशे क्युसेक्स पाणी चालू राहते व नंतर तेही बंद होते, तसेच 489 मीटर पातळीपर्यंत 300 ते 400 क्युसेक्स बोगद्यात पाणी चालते व नंतर पुढे पाणीच पोहोचत नाही, दहिगाव उपसा सिंचन योजना ही देखील 491 मीटर च्या दरम्यान पाणी  बंद होते, याप्रमाणे सात मे ते दहा मे दरम्यान सर्वत्र पाणी बंद झाले आहे.
 विशेष म्हणजे  सोलापूर शहराला पिण्यासाठी म्हणून प्रत्येक हंगामात दर दोन ते अडीच महिन्यानंतर दहा ते बारा दिवस 6000 क्युसेक्स प्रवाहाने पाणी सोडले जाते .त्यामुळे धरणातील एकुण 18 टीएमसी पाणी सोडले जाते ,यातील एक टीएमसी पाणी औंज व टाकळी बंधाऱ्यात साठवले जाते व याचा सोलापूर शहरासाठी वापर केला जातो. प्रत्येक वेळेस एक टीएमसी पाणी म्हणजे एकूण तीन वेळेस तीन टीएमसी पाण्याचा वापर होतो व 15 टीएमसी पाणी प्रवाहामध्ये जाते यासाठी हे पाणी नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्फत कसे वाचेल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे व तसे झाल्यास शेतीसाठी कालवा बोगदा व सिंचन योजनेतून प्रत्येकी 20 ते 25 दिवसाची  दोन आवर्तने नक्कीच पूर्ण होतील  व  जलाशय काठच्या लोकांनाही पाणी कमी पडणार नाही म्हणून जलाशयातून सर्वत्र पाणी सोडणे बंद करावे म्हणणार्यांनी  मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून प्रयत्न करावा.  सध्या पाणी बंद करा म्हणून माजी आमदार महोदयांनी केलेला प्रयत्न म्हणजे पाण्याचे  भांडवल करून स्वार्थी राजकारणासाठी विद्यमान लोकप्रतिनिधींना निष्कारण बदनाम करण्याचे कारस्थान दिसून येत आहे. 
      सीना नदीवरील वरचे बंधारे का भरले म्हणून मोर्चा  काढलेला मोर्चा पूर्णपणे चूकीचा.....  आमदार बबनदादा शिंदे
       बोगद्यातून भीमा सीना जोड कालवा बोगदा तून पाणी चालू असताना सर्व बंधारे भरून घ्यावे म्हणून नदीकाठची लाईट आठ ते दहा दिवस बंद करण्यात आली व टेल टू हेड या नियमाप्रमाणे बंधारे भरून घेण्यास सुरुवात झाली .भरलेले बंधाऱ्याची दारे करून बरे बंद करून त्याच्यावरील बंधारे भरून घेण्याचे काम चालू झाले परंतु ज्या बंधार्‍यात पाणी होते ते पाणी उन्हाळ्यामुळे तातडीने संपवण्यात आले व तोपर्यंत वरील बंधारे भरवण्याचं काम चालूच होतं .खालील बंधाऱ्यातील पाणी कमी होताच वरचे बंधारे का  भरले म्हणून काही राजकीय व्यक्तींनी पाटबंधारे खाते विरोधात मोर्चे काढले परंतु हे पूर्ण चुकीचे असून जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यावर निष्करण दबाव आणल्यासारखे आहे. वास्तविक जलसंपदा विभागाच्या धोरणानुसार फक्त शिरापूर बंधारापर्यंतच पाणी अडवण्यास परवानगी आहे ,त्यामुळे माढा तालुक्यातील सीना नदीवरील बंधारे भरून घेणे हे हक्काचेच आहे, जे हक्काचे आहे तेवढेच पाणी व्यवस्थित मिळावे हीच आमची मागणी आहे, आमदार बबनदादा शिंदे .
 आमदार बबनदादा शिंदेनी असेही म्हटले आहे की बॅक वॉटर ला जी गावे येतात त्यांना धरण मायनस 42 पर्यंत गेले तरीही पाणी पाणी कमी पडत नाही फक्त शेतीसाठीच्या मोटरीचे पाईप वाढवावे लागतात त्यामुळे ऐन उन्हाळ्यात सर्व ठिकाणचे पाणी बंद करू म्हणणाऱ्या नारायण पाटलांनी मागील 40 वर्षाच्या धरणाच्या आयुष्यात व ते स्वतः पदाधिकारी असतानाच्या काळात किती वेळा त्यांनी पाणी वाचवण्यासाठी किंवा धरण किती प्रमाणात खाली गेले हे तपासण्यासाठी प्रयत्न केले हे याचा त्यांनी अभ्यास करावा .नारायण पाटील यांनी सर्व पाणी बंद करण्याचे  शासनास दिलेले निवेदनावर बोगदा व सीना नदीकाठ वरील शेतकरी अतिशय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त  करत आहेत व शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी बंद करा म्हणणाऱ्याचा हिशोब वेळ आल्यावर चुकता केल्याशिवाय राहणार नाही अशी ही प्रतिक्रिया हजारो शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा