Breaking

शुक्रवार, २६ मे, २०२३

पांगरदरवाडी ग्रामपंचायत जनमाहिती अधिकारी कडून माहिती मिळता मिळेना ; दडलंय काय ?



पांगरदरवाडी ग्रामपंचायत जनमाहिती अधिकारी कडून माहिती मिळता मिळेना ; दडलंय काय ?


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

तुळजापूर: केंद्र माहिती अधिकार अधिनियम २००५ हा कायदा भ्रष्टाचार संपुष्टात आणण्यासाठी पारीत केला असला तरी कालांतराने सदरील कायद्याचे संरक्षण व अंमलबजावणी होत नसल्याचे आरटीआय कार्यकर्ते यांनी मागणी केलेली माहिती देण्यासाठी संबंधित जनमाहिती अधिकारी माहिती न देता दडवून ठेवल्याचे समोर येत आहे.
       प्रकार म्हणजे तुळजापूर तालुक्यातील मौजे पांगरदरवाडी ग्रामपंचायत जनमाहिती अधिकारी यांचेकडे तेथील आरटीआय कार्यकर्ते श्री.प्रमोद डोंगरे यांनी (दि.२८/०६/२०२२) रोजी ग्रामपंचायत कार्यालय ग्रामसेवक तथा जनमाहिती अधिकारी यांचेकडे माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये अर्ज सादर केला आहे. मागणी केलेली माहिती मिळाली नाही,माहिती मिळावी.
करीता प्रथम अपिलीय अधिकारी तथा विस्तार अधिकारी (पं), पंचायत समिती कार्यालय तुळजापूर ता.तुळजापूर जि.धाराशिव
(उस्मानाबाद) यांचे कडे (दि.१८/०८/२०२२) रोजी अपील अर्ज सादर केला.
त्यावर (दि.०३/१०/२०२२) रोजी तालुका पंचायत समिती कार्यालय तुळजापूर येथे सुनावणीस हजर राहाण्यास मला सांगण्यात आले.त्याप्रमाणे सुनावणीस मी वेळेत उपस्थित राहिलो.
       हे.की सुनावणी वेळी जनमाहिती अधिकारी यांनी ०७ दिवसांची मुदत मागणी केली असता अपीलीय अधिकारी यांनी मुदतवाढ दिली.मात्र मुदतवाढ घेऊन नही जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवक यांनी माहिती दिली नाही.प्रथम अपीलीय अधिकारी तथा विस्तार अधिकारी (पं) यांनी जनमाहिती अधिकारी यानां माहिती द्या.
त्याबाबत अहवाल ह्या आर्यालयास सादर करा.
असा आदेशही दिलेला आहे.तरीही ग्रामसेवक यांनी माहिती दडवून माहिती अधिकार अधिनियम २००५ कायद्याचे उल्लंघन केले आहे.
त्याचबरोबर आरटीआय कार्यकर्ते श्री.प्रमोद डोंगरे यांनी दुसरे अपील राज्य माहिती आयुक्त,खंडपीठ औरंगाबाद यांचेकडे (दि.१५/१०/२०२२) रोजी सविनय सादर केले आहे.त्यासंदर्भातही अद्याप कोणताही पत्रव्यवहार झाला नसल्याने अर्जदाराने वेळेत सुनावणी घेतली जावी.असा आशयाचे स्मरण पत्र (दि.२४/०५/२०२३) रोजी सादर केले असून संबंधित विभाग काय भूमिका घेणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा