Breaking

मंगळवार, ३० मे, २०२३

क्रांतिभूमी व क्रांतिकारकांच्या कथा या कमलाकर रामराव सावंत लिखित पुस्तकाचे आमदार -अभिमन्यू पवार यांच्या हस्ते प्रकाशन*



*क्रांतिभूमी व क्रांतिकारकांच्या कथा या कमलाकर रामराव सावंत लिखित पुस्तकाचे आमदार -अभिमन्यू पवार यांच्या हस्ते प्रकाशन*


*औसा प्रतिनिधी/ज्ञानेश्वर सूर्यवंशी*

लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथेकै सौ मीना हरिदास मिरकले पाटील फौंडेशन पुणे किल्लारी व दत्तोबा भोसले संरक्षण प्रशिक्षण प्रबोधिनी मातोळा,श्री निलकंठेश्वर मंदिर संस्था आणि स्वातंत्र्य सैनिक पाल्य समिती किल्लारी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांचा गौरव करताना औस्याचे आमदार अभिमन्यु पवार म्हणाले की 'स्वातंत्र्य सैनिक पाल्यांच्या काही महत्त्वाच्या प्रश्नाला शासन दरबारी मांडुन त्या सोडविण्यासाठी मी प्रयत्न करण्याचे अभिवचन देतो.निमित्त होते स्वातंत्र सैनिकांच्या पाल्यांचा गौरव,परिसंवाद आणि कमलाकर रामराव सावंत यांनी लिहिलेल्या 'क्रांतिभुमी व क्रांतिकारकांच्या कथा'या गौरव ग्रंथाच्या प्रकाशनाचे.
त्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष होते श्री विवेकानंद दत्तोबा भोसले, प्रसिद्ध व्यवसाय तज्ञ औरंगाबाद, प्रमुख पाहुणे होते श्री बुवासाहेब उर्फ यशवंतराव जाधव चिलवडीकर, डॉ हनुमंत किणीकर प्रसिद्ध मणका व मेंदू विकार तज्ञ, लातुर ,श्री महेश पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य,श्री सतीश पाटील सहाय्यक गटविकास अधिकारी औसा,श्री सुरेंद्र पाटील, ग्रामीण साहित्यीक,सुभाष जाधव भाजपा तालुकाध्यक्ष औसा तथा सामाजिक कार्यकर्ते ,श्री हरिदास मिरकले पाटील व लेखक कमलाकर सावंत.
सर्वप्रथम स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून व सरदार वल्लभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली गेली.त्यानंतर कमलाकर सावंत लिखित स्वातंत्र्य सैनिक गौरव ग्रंथ 'क्रांतिभुमी व क्रांतिकारकांच्या कथा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.त्या नंतर उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांचा सपत्नीक गौरव करताना आला. आधुनिक विचारांच्या क्रांतीकारकांच्या सुरेंद्र पाटील यांनी प्रकाशित ग्रंथाची ओळख करून दिली.श्री महेश पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.लेखक श्री सावंत पुस्तक लेखना मागची प्रेरणा सांगितली.
डॉ पंडित किल्लारीकर यांनी स्वातंत्र्य सैनिक पाल्य गौरव मुर्तींच्या वतीने मनोगत मांडले.सौ.जयश्री संभाजी पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सतिश भोसले यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंढरी उमाटे, शिवाजी भोसले,पवन भोसले,आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमास लातुर व उस्मानाबाद जिल्ह्यातील साठ स्वातंत्र्य सैनिक पाल्यासह अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा