शरद पवारांनी राजीनाम्याचा मास्टर स्टोक आत्ताच का खेळला ?
. शरद पवारांच्या राजीनाम्यामुळे राज्यातील राष्ट्रवादी एकजूट झाल्याचे चित्र!
. मुंबई (मिलिंद माने ). AJ 24Taas News
**********************************
शरद पवारांच्या. राजीनामाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप झाला. त्यांच्या या निर्णयामुळे जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, प्रफुल्ल पटेल आदी बड्या नेत्यांसह सर्वच लहान मोठे अचंबित झाले. सर्वजण पवारांना हा निर्णय रद्द करण्याची मागणी करू लागले. जयंत पाटलांसह अनेकांना यावेळी अश्रू अनावर झाले. पण पवारांनी हा निर्णय काही अचानक घेतला नाही. त्यांनी नुकतेच भाकरी फिरवण्याचे विधान करून याचे संकेत दिले होते. मात्र शरद पवारांच्या आजच्या राजीनामाच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात एकजूट झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व संस्थापक अध्यक्ष
शरद पवारांची पक्षातील'पॉवर' कमी झाली होती का? ती शरद पवारांच्या नंतर पक्षाची धुरा कोण सांभाळू शकतो पक्ष जिवंत ठेवणे किती महत्त्वाचे आहे हे पवारांना कळले असल्याने व पक्षात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी व आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व येणाऱ्या विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत पक्ष मजबूत पद्धतीने उभारावा यासाठी शरद पवारांनी राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय निरीक्षकांमध्ये व्यक्त केली जात असली तरी शरद पवार राजकीय क्षेत्रातून मात्र निवृत्त झालेले नाहीत त्यांची राज्यसभेची मुदत अजून तीन वर्ष बाकी आहे अशा परिस्थितीत त्यांच्या हयातीत पक्षाने पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घ्यावी यासाठी शरद पवारांनी उचललेले हे पाऊल तर नाही ना अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांकडून राज्यात ऐकण्यास मिळत आहे
शरद पवारांनी मंगळवारी अचानक राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली. त्यांच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांना धक्का बसला. पण पवार आपल्या अशाच धक्कातंत्रासाठी आज पर्यंत ओळखले जातात. त्यांची प्रत्येक कृती व त्यांनी केलेले विधान महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सर्वच राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. पण मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीतील त्यांची 'पॉवर' कमी होऊन अजित पवारांचा दबदबा वाढल्याचे चित्र निर्माण झाले होते.
असे म्हटले जात आहे की, या घटनाक्रमामुळे शरद पवार काहीसे नाराज होते. यामुळेच त्यांनी 2 दिवसांपूर्वी भाकरी फिरवण्याचे विधान करून आपल्या राजीनाम्याचे संकेत दिले होते. ते एका कार्यक्रमात म्हणाले होते - 'भाकरी वेळीच फिरवली पाहिजे. त्यात उशीर झाला तर करपू शकते. पक्षात आता ही वेळ आली आहे.'
शरद पवारांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीत भविष्यात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती अजित पवारांचे बोलायचे तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी यापूर्वीही अनेकदा अडचण निर्माण केली होती मागील 2019 मध्ये त्यांनी पक्षाशी बंडखोरी करून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता पुन्हा ते भाजपसोबत जाण्याची चर्चा रंगली आहे.
हा शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक?
........................
सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवारांनी राजीनाम्याची घोषणा करून मास्टर स्ट्रोक लगावला आहे. गत काही दिवसांपासून अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसोबत बंडखोरी करून भाजपसोबत जाण्याची चर्चा रंगली आहे. या चर्चेवर शरद पवारांनी आपली रोखठोक भूमिका व्यक्त केली होती. 'हा निर्णय वैयक्तिक असू शकतो. पण राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही,' असे ते म्हणाले होते.
अजित पवारांच्या कथित संभाव्य बंडखोरीच्या बातम्यांमुळे एनसीपी कमकूवत होत असल्याच्या चर्चेनेही जोर धरला आहे. पण शरद पवारांनी अचानक अध्यक्षपद सोडण्याची घोषणा करून पक्षात पुन्हा एकदा प्राण ओतण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्यांचे नेते व कार्यकर्ते त्यांच्याकडे त्यांचा निर्णय बदलण्याची मागणी करत आहेत. अनेकजण तर रडून आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
दरम्यान, शरद पवारांच्या एका निर्णयामुळे अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस एकजूट झाल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित दादा पवार यांचे राष्ट्रवादीत चाललेले बंड हे भाजपा जाण्यासाठी नाही तर पक्ष यापुढे कोणाच्या नेतृत्वात चालेल यासाठी होते का? विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे प्रफुल पटेल यांच्यासह अमित शहा यांना दिल्लीत भेटले त्यांनी 40 आमदारांच्या साह्या घेतल्या अशा बातम्या जेव्हा प्रसार माध्यमांमध्ये आल्या त्यावेळी अजित दादांचे बंड हे हे भाजपासोबत जाण्याचे नसून पक्ष भविष्यात कोणाच्या नेतृत्वा पुढे चालणार यासाठी तर नव्हते ना अशी शंका आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष व संस्थापक शरद पवार यांनी त्यांच्या दिलेल्या राजीनाम्या वरून स्पष्ट होत आहे
. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राजीनाम्यावरून बोलताना म्हणाले की गेली सहा दशके मी राजकीय जीवनात आहे अनेक पदे मला मिळाली सध्या मी राज्यसभेवर आहे याची तीन वर्षे बाकी आहेत तीन वर्ष संपल्यानंतर मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही आणि कोणतीही जबाबदारी घेणार नाही अशी घोषणा त्यांनी केली तसेच त्यावेळी बोलताना ते म्हणाले की माझी निवृत्ती सार्वजनिक जीवनातून नाही याआधीही मी संशोधन, कृषी ,शिक्षण क्षेत्रात, काम करत होतो . यापुढे देखील काम करत राहील असे त्यांनी स्पष्ट केले मात्र सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरही केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचीच चर्चा सुरू असल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात सोशल मीडियापासून गावागावातील पारांवर चहाच्या टपऱ्यांपासून हॉटेलमध्ये व उपाहारगृहांमध्ये सर्वत्र पाहण्यास मिळत आहे
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तडकाफडकी राजीनाम्याचा घेतलेला निर्णय यामागे शिवसेनेची शिंदेंमुळे घडली ती परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसवर येऊ नये यासाठी शरद पवारांनी काही दिवसापूर्वी पक्षाचे सर्व अधिकार स्वतःकडे घेतले होते याची कोण कोण अजित पवारांना आलेली असल्याने मागील काही दिवसात त्यांच्या बाबतीत ज्या घडामोडी झाल्या त्यावरून शरद पवारांनी आपल्या अध्यक्षतेखाली पक्ष असताना पक्षा त शिवसेनेसारखी गत निर्माण होऊ नये त्यासाठी आजचा राजीनाम्याचा निर्णय घेतला असे देखील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे
शरद पवारांच्या राजीनाम्याचा खरा धसका घेतला शिवसेनेने
................................
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचा दिलेला राजीनामा याचा खरा धस का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने घेतला आहे कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो की वर्षभराने येणाऱ्या विधानसभेच्या व लोकसभेच्या निवडणुका असो उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तर शिवसेनेला म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला भाजपा शिवसेना शिंदे गट महाराष्ट्र नवनिर्माण सेना काँग्रेस पक्ष यांच्याबरोबर दोन हात करावे लागणार आहेत
राज्यात विधानसभा व लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्षाहून अधिक कालावधी बाकी असताना जागा वाटपावरून महाविकास आघाडी मोठी फूट होऊ शकते असे राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे
सन 2019 च्या विधानसभेतील संख्याबळाचा विचार केल्यास शिवसेनेने 288 मतदार संघापैकी शिवसेनेला महाविकास आघाडी राहिल्यास 80 पेक्षा जास्त जागा वाट्याला मिळण्याची शक्यता नाही यापूर्वी युती दीडशे जागांचा आग्रह धरणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 50 जागांच्या वर बोलवण होऊ शकते अशावेळी पुन्हा शिवसेना काय करणार?
राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपा व शिंदे गट हे एकत्र लढतील व त्याचा फटका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला व्हावा हीच भाजपाची खरी रणनीती आहे जर जागा वाटपावरून आत्ता हयात असणारी महाविकास आघाडी मधील काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या मतभेद झाले व व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फाटा फूट झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मिळवून महाराष्ट्र विधानसभेतील 288 जागांपैकी 160 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस व 128 जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट लढतील असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे आपल्याला राज्यभर सहानुभूती असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महाराष्ट्रात जास्त जागांसाठी आग्रह असेल मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस याला सहमत असणार नाही व या मुद्द्यावरच महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून समझोता होण्याची शक्यता कमी दिसते त्यामुळे भविष्यात महाविकास आघाडी मध्ये बिघाडी होणार हे स्पष्ट असल्याचे चित्र आज तरी दिसत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा