Breaking

मंगळवार, २३ मे, २०२३

सुळेवाडी येथील पिण्याच्या पाण्याचा सुरळीतपणे पुरवठा करण्याची विक्रम सुळे यांची ग्रामपंचायतीकडे मागणी.




सुळेवाडी येथील  पिण्याच्या पाण्याचा  सुरळीतपणे पुरवठा करण्याची विक्रम सुळे यांची ग्रामपंचायतीकडे मागणी.               

  पिलीव प्रतिनिधी -  
माळशिरस तालुक्यातील  सुळेवाडी  येथे सध्या  पाण्याची टंचाई  आहे .गेल्या काही दिवसापासुन सार्वजनिक पाणीपुरवठा सुरळीतपणे  होत नाही.याविषयी ग्रामपंचायतीकडे  विचारणा केली असता पदाधिकारी व्यवस्थीत उत्तर देत नाहीत. तसेच  सुळेवाडी गावात   सार्वजनिक  सांडपाणी व शौचालयाची कसलीही सोय नाही. ग्रामपंचायतीमारफत नागरिकांना ज्या सोयीसुविधा दयायला पाहिजेत त्या  दिल्या  जात नाहीत. सुविधा  न देता ग्रामपंचायत लोकांकडुन घरपटटी ,व पाणीपटटी वसुलीसाठी तगादा लावते जर पाणीपुरवठाच केला जात नसेल तर नागरिकांनी पाणीपटटी काय म्हणुन  भरायची .पाणीपुरवठा करण्यासाठी ताबडतोब टँकर सुरु  करावेत व पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा गावातील नागरिक ग्रामपंचायतीच्या विरोधात माळशिरस  पंचायत समीतीवर      मोर्चा काढतील असा इशारा युवा नेते विक्रम सुळे यांनी लेखी निवेदनादवारे सरपंच  व ग्रामसेवक  सुळेवाडी  यांना दिला आहे.     तर पाण्याच्या समसयेविषयी सरपंच  बापु करडे यांना विचारले असता  सध्या  गावात  पाणी टंचाई आहे  लोकसहभागातुन टँकर  चालु केला आहे. तसेच  एका बोअरमधुन पाणी उचलुन पाणीपुरवठा  विहीरीत टाकुन पाणीपुरवठा  करण्याचे नियोजन आहे. प्रशासनाककडे सुदधा  टँकरची मागणी केली असल्याचे सरपंचानी सांगीतले.
*************************************
***********advt****************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा