कैलास पाटील जिल्ह्यातील एक चांगले नेतृत्व - खासदार ओमराजे निंबाळकर.
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
कैलास पाटील जिल्ह्यातील एक चांगले नेतृत्व - खासदार ओमराजे निंबाळकर
धाराशिव ता. 23 ः कैलास पाटील यांच्यासारख्या कार्यकर्त्यांस जिल्हा परिषदेला निवडुन दिल्यानेच ते जिल्ह्यातील नवे नेतृत्व म्हणुन उदयाला आले, त्यामध्ये चिखली व सांजा गटातील गावाचे खुप मोठ योगदान असल्याचे मत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यानी व्यक्त केले. चिखली (ता.धाराशिव) येथील जलजीवनच्या माध्यमातुन राबविलेल्या पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन व एकाचवेळी दहा जणांची भरती झालेल्या पोलीसांच्या सत्काराच्या सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, सरपंच वृंदावणी जाधवर, उपसरपंच उत्रेश्वर जाधव, रामकृष्ण मते, डॉ. सिध्देश्वर जाधव, रमेश जाधव, ज्ञानेश्वर जाधव, विकास जाधव, बापु जावळे, व्यंकट जाधव, संजय गोडसे, सचिन जाधव, पवन वाठवडे, नेताजी चव्हाण, नवनाथ बोंदर, बळीराम जाधव, रंगनाथ सावंत, तारक मते, साहेबराव जावळे, काकासाहेब खंडाळकर, समाधान जाधव आदीची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ओमराजे म्हणाले की, कैलास पाटील राज्यातील एकनिष्ट आमदार म्हणुन नावारुपाला आले आहेत. स्वार्थासाठी पक्ष व मतदारसंघ बदलणारे एकीकडे व दुसरीकडे संघर्ष करण्याची तयारी ठेवणारे असा फरक दोन आमदारामध्ये आहे. चिखली गावातील पाण्याचा प्रश्न जलजीवन योजनेच्या माध्यमातुन सुटणार आहे. हे काम दर्जेदार व गुणवत्तापुर्ण होण्याकडे सर्वांनी लक्ष ठेवण्याचे अवाहन खासदार ओमराजे यानी यावेळी केले. शिवाय जे विद्यार्थी आता पोलीस भरतीमध्ये उतीर्ण झाले त्यानी आता पुढील स्पर्धा परिक्षा देऊन अधिकारी होण्याची जिद्द ठेवावी असा सल्लाही त्यानी दिला.
आमदार पाटील म्हणाले की, चिखली व सारोळा गावामध्ये मी कधीच फरक केलेला नाही, ज्याप्रमाणे माझे गाव आहे अगदी तसेच चिखलीला मानतो. जिल्हा परिषदेला याच मतदारसंघामुळे मी निवडुन आलो व पुढे आमदार देखील झालो. या सगळ्या वाटचालीत चिखलीसह सांजा गटातील गावाचे महत्वपुर्ण योगदान असल्याचे आमदार पाटील यानी सांगितले. चिखलीच्या विकास कामासाठी गावाला या अगोदरही निधी दिला असुन पुढील काळातही निधीची कमतरता भासु देणार नसल्याचा विश्वास त्यानी यावेळी गावकऱ्यांना दिला. गावातील विद्यार्थ्यांनी मोठ्या जिद्दीने शासकीय नोकरभरतीमध्ये ठसा उमटविला आहे ही गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे, आता फक्त नोकरदाराचे गाव राहु न देता हे अधिकाऱ्यांचे गाव झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचे अवाहन आमदार पाटील यानी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. सिध्देश्वर जाधव तर प्रास्ताविक रामकृष्ण मते यानी केले. कार्यक्रमाचे आभार सरपंच वृंदावणी जाधवर यानी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा