पिलीव येथे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे झाड पडुन दोन शेळया ठार एक जखमी
पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे २६ मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यामुळे लक्ष्मीनगर येथील अण्णा गुलाब सुळे यांच्या शेळया विसाव्यासाठी आंब्याच्या झाडाखाली बसलेल्या असताना आंब्याचे झाड पडल्यामुळे दोन शेळया जागीच ठार झाल्या तर एक शेळी जखमी झाली. तर याचवेळी त्या आंब्याच्या झाडावर महावितरणचा पोलही पडला सूदैवाने यावेळी विदयुत प्रवाह सुरू नव्हता त्यामुळे मोठा अनर्थ टळला.कारण शेळयांचा मोठा कळप व राखण करणारे यावेळी त्या झाडाखालीच थांबले होते. सदरच्या घटनेचा पिलीवचे तलाठी अनील चव्हाण यांनी तसेच पशुवैदयकीय अधिकारी शेंडगे यांनी रितसर पंचनामा केला असुन अहवाल शासनास पाठविला आहे. मृत शेळयाचे शवविच्छेदन करणयात आले तसेच जखमी शेळीवर उपचार करणयात आला. त्याचा अहवाल पुढील कार्यवाही साठी पाठविणयात आला आहे. सध्या जोरदार वादळी वारे तसेच विजांचा कडकडाट पाहवयास मिळत आहे त्यामुळे नागरिकांनी आपली जनावरे ,शेळया यांची काळजी घेणे आवश्यक आहे. झाडाखाली व महावितरणच्या पोलजवळ जनावरे बांधणे टाळुन काळजी घेणे आवश्यक आहे. फोटो - वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे पडलेले झाड त्याखाली सापडलेल्या शेळया
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा