*सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त अरवत यांनी कार्यालयीन प्रेसनोट द्वारे जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना नोंदणी करून ओळखपत्र घेण्याचे केले आव्हान*
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
तुळजाभवानी कामगार संघटनेने मा. जिल्हाधिकारी कार्यालय व समाजकल्याण कार्यालय उस्मानाबाद यांच्याकडे जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांची नोंदणी करून ओळखपत्र देण्यासाठी केलेल्या सततच्या मागणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्या सूचनेवरून सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त अरवत यांच्या नियोजनाने दि. 12-06-2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ऊसतोड जिल्हा समितीची विशेष बैठक बोलविण्यात आली. या बैठकीस राहुल गुप्ता मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., इतर विभागाचे अधिकारी, संघटनेचे अध्यक्ष सुरेश पवार, जिल्हाध्यक्ष संतोष राठोड यांच्या उपस्थिती होती.
सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त अरवत यांच्या स्तरावरून जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील 17 साखर कारखाना प्रशासनास कारखाना अंतर्गत ऊसतोडी करणाऱ्या कामगारांची यादी नोंदणीस्तव त्वरीत जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले होते. त्यानुसार जिल्ह्यातील 11 साखर कारखाना प्रशासनाकडून ऊसतोड कामगारांची प्राप्त झालेली आहे .यादीनुसार ग्रामीण भागातील ग्रामपंचायत स्तरावर ऊसतोड कामगारांचे फॉर्म भरून चुकीची नोंदणी होऊ नये ही काळजी घेण्यासाठी कामगारांच्या फॉर्म बरोबर स्वघोषणापत्र भरून ओळखपत्र देण्याचे प्रत्येक तालुक्याचे गटविकास अधिकारी यांना जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्या सहीचे आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.
तसेच जिल्हा समितीच्या विशेष बैठकीत जिल्हा व राज्याबाहेर ऊसतोडी करणारे कामगार नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी 20 व 21 जून रोजी उस्मानाबाद जिल्हाभर ग्रामसेवक स्तरावरून गावपातळीवर दवंडी देऊन, गावातील लोकांना नोटीस बजावून एकाच दिवशी जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांची नोंदणी करून ओळखपत्र देण्यासाठी विशेष मोहीम (शिबीर)आयोजनाचे शासनाच्या विचाराधीन आहे. या नोंदणी शिबिरात सर्वांनी सहभाग घेऊन नोंदणी करावी.
जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध कल्याणकारी योजनेच्या प्रवाहात आणण्यासाठी अधिकारी प्रयत्नाची पराकाष्ठा करीत आहेत.
सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त अरवत यांच्या वतीने जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना नोंदणी करून ओळखपत्र घेण्याचे जाहीर आवाहन करण्यात आलेला आहे. तरी आपण सर्वांनी 20 आणि 21 जून रोजी आपापल्या गावात ग्रामपंचायत कार्यालय येथे जाऊन त्वरीत नोंदणी करून योजनेचा पूरेपूर लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा