Breaking

बुधवार, २८ जून, २०२३

*समाजवादी विचार सरणी पुन्हा उभारी घेईल.ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस यांचा विश्वास.* *भाई वैद्य पत्रकारिता पुरस्कार पत्रकार अरुण कोरे व समाजसेवक बाळासाहेब पाटणकर यांना प्रदान सोहळा संपन्न*



*समाजवादी विचार सरणी पुन्हा उभारी घेईल.ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस यांचा विश्वास.*

    *भाई वैद्य पत्रकारिता पुरस्कार पत्रकार अरुण कोरे व समाजसेवक बाळासाहेब पाटणकर यांना प्रदान सोहळा संपन्न

*
कुर्डुवाडी, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या दोन सुत्राभोवतीच देशाची राज्यघटना विणलेली आहे.त्यामुळे समाजवादी विचारांना मुठमाती देण्याचा सरकारचा अथवा कोणत्याही पक्षाचा प्रयत्न कदापी यशस्वी होणार नाही.समाजवादी विचारसरणी पुन्हा उभारी घेईल असा विश्वास ज्येष्ठ समीक्षक, विचारवंत साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केला.


पत्रकार अरुण कोरे यांच्या पत्नी सौ.छाया कोरे यांनीही पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल त्यांचाही यथोचित गौरव करण्यात आला.
  ज्येष्ठ समाजवादी नेते स्व.भाई वैद्य यांच्या जयंतीनिमित्त ज्ञान फौंडेशनतर्फे ""लोकनेते भाई वैद्य पत्रकारिता पुरस्कार"कुर्डुवाडीचे ज्येष्ठ पत्रकार अरुण कोरे व "लोकनेते भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार" समाजसेवक बाळासाहेब पाटणकर यांना डॉ.सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.त्यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.आरोग्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अभिजीत वैद्य,महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, ज्ञान फौंडेशनचे अध्यक्ष मनोहर कोलते,वास्तुविशारद रमेश चव्हाण आदी प्रमुख उपस्थित होते.

  सबनीस म्हणाले,आज समाजवाद इतिहासजमा झाल्यासारखी स्थिती आहे.मुळात भारतीय राज्यघटनाच समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या दोन सुत्राभोवतीच विणली गेली आहे.त्यामुळे समाजवाद इतिहासजमा होऊ शकणार नाही.या विचाराला मुठमाती देण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु तो कोणीही नष्ट करु शकत नाही.सेक्युलर समाजवाद हा भारतासाठी आवश्यक असून या विचारांचा जागर व्हायला हवा.आजचे हिंदुत्ववादी हे खोटे आहेत.महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद यांचे हिंदूत्व सर्वसमावेशक आहे.चांगुलपणा दुर्मिळ झाला आहे.भ्रष्ट,व्यभिचारी वृत्ती, करंटेपणा वाढला असून त्यामुळे मानवतावादापुढे आव्हाने निर्माण झाली आहेत.अशा काळात बाळासाहेब पाटणकर व ज्येष्ठ पत्रकार अरुण कोरे यांचे कार्य दिशादर्शक व दीपस्तंभासारखे आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.सत्यनिष्ठ पत्रकारिता व चौथा स्तंभ मृत्यू पंथाला लागणे हे लोकशाहीच्या दृष्टीने चांगले लक्षण नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
   डॉ.अभिजीत वैद्य म्हणाले, पाटणकर यांना कोणताही धर्म जात लागू होत नाही ते भारताचे खरे रूप आहेत.देशातील महनीय नेते,विचारवंत यांनी पाहीलेले देशाचे रुप उध्वस्त होताना दिसत आहे.आज प्रश्न विचारण्याला बंदी आहे.सत्तेला सुनावू शकतो तो खरा पत्रकार.अन्याय,भ्रष्टाचार विरोधी लेखणी झिजवताना पत्रकार अरुण कोरे यांनी शोध पत्रकारितेच्या माध्यमांतून केलेली जनजागृती व कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे.हुकुमशहांना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत.सध्याच्या पंतप्रधानांनी एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही.अशी टिकाही त्यांनी केली.राजेंद्र पवार यांनी ज्येष्ठ पत्रकार कोरे, समाजसेवक पाटणकर यांचे योगदान अनन्यसाधारण आहे.त्यातून अनेकांना प्रेरणा मिळणार आहे.
****************************************
दादा कोंडके मेमोरियल फौंडेशन पुणे तर्फे आर्किटेक्ट रमेश चव्हाण यांचा अनेक वास्तू,स्मृति स्थळे आदी ८५० प्रकारच्या वास्तूचे डिझाईन्स व त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या सामाजिक कार्याबद्दल दादा कोंडके विशेष सन्मान पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
*****************************************
   याप्रसंगी सत्कारमूर्ती ज्येष्ठ पत्रकार अरुण कोरे,समाजसेवक बाळासाहेब पाटणकर यांनी आपल्या भाषणात प्रतिकुल परिस्थितीत समाजाचे लागणा-या देण्यांतून जाणीवपूर्वक केलेल्या कामाचे अनुभवात्मक सविस्तर विवेचन केले.
   याच समारंभात पुण्याचे वास्तुविशारद रमेश चव्हाण यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचाही स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.भर पावसात सभागृह तुडुंब भरले होते.
   प्रास्ताविकात फौंडेशनचे अध्यक्ष मनोहर कोलते यांनी भाई वैद्य यांच्या चतुरस्त्र कार्याचा आढावा घेतला.संतोष म्हस्के यांनी सुत्रसंचलन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा