18 सप्टेंबर पासून भीमा बरोबरच सीना नदी, बोगदा, कालवा व दोन्ही सिंचन योजनेतून पिण्यासाठी पाणी सोडा आ. बबनदादा शिंदे यांची मुख्यमंत्र्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्याकडे मागणी
... शेतीला एक आवर्तन दिल्यास शासनाचे करोडो रुपये वाचतील
बेंबळे।प्रतिनिधी। AJ 24 taas News साठी मुकुंद रामदासी
सोलापूर पंढरपूर सांगोला मंगळवेढा व भीमा नदी काठावरील शेकडो गावांच्या पिण्यासाठी सोमवार दिनांक 18 सप्टेंबर पासून भीमा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सीना नदी उजनी डावा कालवा व सिना माढा आणि दहीगाव सिंचन योजनांच्या काठावरील शेकडो गावातील नागरिक व पशुधनाची पिण्याच्यापाण्या वाचून सध्या तडफड होऊ लागली आहे. जिल्हाधिकारी व जलसंपदा पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी भीमा नदीबरोबरच ,कालव्यातून तसेच बोगद्यातून सीनेत व सिना माढा आणि दहीगाव सिंचन योजना मधून पिण्यासाठी पाणी सोडावे अशी रास्त , आग्रही व वस्तुस्थिती जन्य मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे, तसेच पिण्याच्या पाण्यासाठी भीमाकाठच्या नागरिकांना सकारात्मक न्याय व सीनाकाठ, कालवा, बोगदा व दोन्ही सिंचन योजनेवरील नागरिक व पशुधनाबाबत नकारात्मकता का ...?व अशी विषमता केल्यास जनतेमधून रोश, प्रक्षोभ व तीव्र नाराजी निर्माण होईल व याचे परिणाम भविष्यात चांगले होणार नाहीत असा इशाराही आमदार शिंदे यांनी निवेदनात दिलेला आहे.
वृत्तांत असा की मागील तीन महिन्यात समाधानकारक पाऊस नसल्यामुळे व पावसाळ्याचा एक महिना फक्त बाकी असताना उजनी 24 टक्के पाणी आले असून 493 मीटर पाणी पातळी व 76 टीएमसी पाणी साठा झालेला आहे, उजनीच्या वरील 19 धरणात समाधानकारक पाणीसाठा पूर्वीच झालेला आहे.
चौकट....
सोलापूर महानगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी टाकळी व चिंचपूर या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधार्यात 30 सप्टेंबर 23 पर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा असून एक ऑक्टोबर पासून पाण्याची सोय व्हावी अशी मागणी केली आहे. तसेच पंढरपूर सांगोला मंगळवेढा इथूनही वाटबांधरे विभाग व जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पीण्यासाठी पाणी मागणी केलेली आहे. त्यानुसार जलसंपदा विभागाचे नियोजन असून 18 सप्टेंबर रोजी उजनीतून 5 हजार 500क्युसेक्स विसर्गाने एकूण साडेपाच ते सहा टीएमसी पाणी , जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. उजनी ते औंजटाकळी व चिंचपुर हे अंतर 232 किलोमीटर असून पाणी पोहोचण्यास अकरा दिवस लागणार आहेत व त्या अनुषंगाने 18 सप्टेंबर रोजी उजनीतून सोडलेले पाणी 29 किंवा 30 सप्टेंबर पर्यंत बंधार्यात पोहोचेल तसेच या मार्गावर असलेल्या पंढरपूर मंगळवेढा सांगोला या शहरानाही पिण्यासाठी पाणी कमी पडणार नाही असे नियो जन करण्यात आले आहे ....धीरज साळे अधीक्षक अभियंता जलसंपदा विभाग सोलापूर.
चौकट .....
कालेव्यातून पिण्यासाठी पाणी सोडून करकंब व ़येवती तलाव भरून घ्यावेत जेणेकरून बावी, माढा, उपळाई बुद्रुक आष्टी व तलावावर अवलंबून सर्व गावांना पिण्यासाठी पाणी कमी पडणार नाही. शेतीसाठी एक आवर्तन दिल्यास शासनाचे कोट्यावधी रुपये वाचणार आहेत...
सध्याच्या अवर्षण ग्रस्त स्थितीत कालवा, बोगदा,सीना माढा व दहिगाव सिंचन योजनेतून शेतीसाठी पाण्याचे एक आवर्तन दिल्यास जळून चाललेली सर्व प्रकारची पिके हाती लागतील, ओढे नाले विहिरी बोरवल या सर्व ठिकाणी जल स्त्रोतांमध्ये परकुलेशनमुळे पाणी पातळी वाढेल व गावोगावी पाण्याचे टँकर पुरवणे, जनावरासाठी छावण्या काढणे त्यांना चारा वैरण पुरवणे हे सर्व किमान दोन ते तीन महिने लांबवले जाईल व त्यामुळे शासनाचे कोट्यावधी रुपये वाचतील हे निश्चित आमदार बबनदादा शिंदे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा