*दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उजनीतील कमी पाणीसाठ्यातही कुर्डुवाडी न.पा.चा पाणी पुरवठा सुरळीतच...*
*इतर सर्व शहरात तीन ते सहा दिवसाआड पाणी तर कुर्डुवाडीत एकदिवसाआड...*
*पाणी काटकसरीने वापरले तरच आशादायी परिस्थिती अन्यथा शहरी भागांची होणार पाण्यासाठी वणवण...*
अरुण कोरे (पत्रकार) कुर्डुवाडी,प्रतिनिधी,
कुर्डुवाडी शहरास पाणीपुरवठा उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून होत आहे.चालू वर्षी या क्षेत्रात फारच कमी पाऊस पडला असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
उजनी धरण गेल्या वर्षी ऑगस्टमध्येच ओव्हर फ्लो झाले होते.चालू वर्षी मात्र सप्टेंबर अर्धा संपला तरी पावसाने डोळे वटारलेलेच असून ठोस पावसाचीही चिन्हे नाहीत.
उजनी धरणात सध्या २३ टक्के पाणीसाठा असून गतवर्षीच्या तुलनेत ७७ टक्के पाणीसाठा कमी आहे.पुणे जिल्ह्यातही पाऊस कमी झाल्याने तेथील २५ पैकी १८ धरणं अजूनही पूर्ण क्षमतेने भरली नसल्याने तेथेही बिकट परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.साधारणपणे पुणे जिल्ह्यातील धरणे भरली की त्याचा फायदा उजनी धरण भरण्यास व त्यावर अवलंबीत जिल्ह्यातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी होतो.
गतवर्षीच्या तुलनेत ७७ टक्के कमी पाणीसाठा अन् गेल्या महीना सव्वा महिन्यातील नसलेल्या पावसाची तूट यामुळे शेतीचा प्रश्नही ऐरणीवर आला असल्याने ऐन पावसाळ्यात उभी पिके जळू लागली आहेत.
उजनी धरणाच्या पाण्यावर कुर्डुवाडी बरोबरच बार्शी,सोलापूर पंढरपूर,सांगोला,उस्मानाबाद आदी शहरांमध्ये उजनीचाच पाणी पुरवठा सुरू आहे.
कुर्डुवाडी शहर वगळता वरील सर्व शहरांमध्ये तीन ते सहा दिवसाआड व आठवडा आठवडा पाणी पुरवठा होत नाही.महिना अखेरपर्यंत पाऊस नाही झाला तर यापेक्षा गंभीर समस्या उद्भवणार असून धरणातच नाही तर द्यायचं कुठून?(आडातच नाही तर पोह-यात कुठून येणार?)अशी परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
कुर्डुवाडी शहरास सध्या पर्यंत तरी पाणीपुरवठा एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरळीत चालू आहे.कुर्डुवाडी शहराची निकृष्ट झालेली जुनी जलवाहिनी,अनियमित वीजपुरवठा, शासनाने न भरल्याने कमी कर्मचारी संख्या, तांत्रिक बिघाड आदी अडचणीवर मात करूनही तुलनेत पाणीपुरवठा कुर्डुवाडीस फारच चांगला होतो आहे असे दिसून येते.
मात्र काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व काही उपटसुंभ टीकाकार कुर्डुवाडी न.पा.प्रशासनावर वस्तू स्थिती व परिस्थिती न पहाता कमरेखालची टिका सोशल मीडियावर करताना दिसून येत आहे ती निश्चितच निषेधार्थ आहे.त्यांनी व सुजाण नागरिकांनी पाणी पुरवठ्याच्या प्रश्नाचं गांभीर्य ओळखून तारतम्य बाळगून पाणी काटकसरीने वापरणे व प्रशासनाच्या अडचणी समजून घेणे ही काळाची गरज बनली आहे.
सांगोल्याचा पुरवठा गेल्या पंधरा दिवसांपासून तीन दिवसाआड केला आहे.पंढरपूर व सोलापूरला उजनी धरणातील पाणी सोडण्याचे घाटत असून ते आज उद्या सोडावेच लागणार आहे.त्यानंतर व उजनी धरणाचा पसा-याच्या पार्श्वभूमीवर होणारे बाष्पीभवनामुळे उजनीचे पाणी लवकरच ऐन पावसाळ्यात मायनस मध्ये लवकरच जाण्याची भिती आहेच.
शेती बरोबरच,जनावरांची निगा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने सर्वत्र चिंतातुर वातावरण निर्माण झाले आहे.अरुण कोरे(पत्रकार) कुर्डुवाडी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा