*आधार फाउंडेशने दहीहंडी सारखे कार्यक्रम घेऊन सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम केले आहे. धनराज दादा शिंदे*
*दहीहंडी फोडण्यात रुद्र बागाव ठरला विजयी*
टेंभुर्णी (प्रतिनिधी):-आधार फाउंडेशनच्या वतीने वडोली (ता माढा) येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी चे औचित्य साधून बुधवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी एकेरी दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन विठ्ठल गंगा प्रोडूसर कंपनीचे संस्थापक अध्यक्ष धनराज दादा शिंदे यांच्या हस्ते, जिल्हा परिषदेचे मा. कृषी सभापती संजय पाटील भिमानगरकर व ऊस दर नियंत्रण समितीचे माजी सदस्य शिवाजीराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, माढा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन तुकाराम उर्फ बंडू नाना ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला.
एकेरी दहीहंडी स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा तालुका प्रसिद्धीप्रमुख पत्रकार सतीश काळे यांच्या वतीने करण्यात आले.
स्पर्धेमध्ये १०५ लोकांनी नाव नोंदणी केली. लकी ड्रॉ पद्धतीने चिठ्ठी काढून प्रत्येक स्पर्धकाला दोन मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. या वेळेत रुद्र सुनील बागाव यांनी दहीहंडी फोडण्याचा मान पटकाविला. पाच हजार एक रुपये रोख, सन्मान चिन्ह, श्रीफळ, कोल्हापुरी फेटा व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
धनराज शिंदे म्हणाले आपल्या भारत देशाला संस्कृती वारसा लाभलेला असून आधुनिक युगात तो लोप पावला जात आहे. तरी आधार फाउंडेशन नी दहीहंडी सारखे कार्यक्रम घेऊन सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम केले आहे. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार सतीश काळे व त्यांची सर्व स्टीमचे मनापासून अभिनंदन करतो. अशा दहीहंडी सारख्या कार्यक्रमात तरुणा बरोबर तरुणी व महिलांना देखील या कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे.
अध्यक्षीय भाषणात बंडू नाना ढवळे म्हणाले आधार फाउंडेशन च्या माध्यमातून पत्रकार सतीश काळे हे वेळोवेळी सामाजिक उपक्रम घेत असतात. जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. व गोकुळाष्टमीनिमित्त तरुणांसाठी आज दहीहंडीचे आयोजन केले आहे ही कौतुकास्पद बाब आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या चित्राताई वाघ, टेंभुर्णी येथील युवा नेते सुरज देशमुख, तांबवे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष नागनाथ खटके पाटील, शंकर सह. साखर कारखान्याचे मा. संचालक दीपक पाटील, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाटील सर, यशोदीप कॉम्प्युटर चे संस्थापक गोरख खटके सर, शिव विचार प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय खटके पाटील, सूर्ली चे डॉक्टर मनोज काळे, शिराळ चे सरपंच बाळासाहेब ढेकणे, प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल जगदाळे, मा उपसभापती धनाजी जवळगे, टेंभुर्णी चे ग्रा.पं. सदस्य भाऊसाहेब महाडिक, बेंबळेचे युवा नेते अविनाश भोसले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, वंचित बहुजन आघाडीचे महासचिव विशाल नवगिरे, चांदजचे माजी उपसरपंच तानाजी गाडे, उजनीचे आनंद पानबुडे, वैनगंगा बॅंकेचे मयूर आखाडे, पत्रकार नाथा सावंत, आढेगावचे भाऊ पिसाळ आदी मान्यवरांसह युवक, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे साऊंड सिस्टीम बालाजी मस्तुदे, सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी तर आभार पोलीस पाटील धनाजी काळे यांनी मांनले.
चौकट
शहरी भागात उंच उंच थर लावून दहीहंडी केली जाते परंतु अशा दहीहंडीतून अनेक जणांना दुखापती होतात त्यामुळे उंच थराची दहीहंडी न करता एकेरी डोळे बांधून दहीहंडी फोडायची असे नियोजन केले आहे. यातून श्रीकृष्ण जन्माष्टमी बरोबरच सर्वांचे मनोरंजन देखील होत आहे. भविष्यात महिलांसाठी देवदर्शन सहल काढण्याचे नियोजन आहे.
--- पत्रकार सतिश काळे
संस्थापक अध्यक्ष आधार फाउंडेशन, वडोली.
चौकट २
*आधार फाउंडेशनच्या वतीने राजकुमार पाटील यांचा सन्मान*
आधार फाउंडेशन, वडोली यांच्या वतीने जिल्हा नियोजन कमिटी वरती अकोले (खु) येथील राजकुमार पाटील यांची निवड झाल्याबद्दल प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, कोल्हापुरी मानाचा फेटा व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा