नगरपालिकेने शहरातील व्यावसायिकांच्या,टपरी, फळ विक्रेत्यांच्या पोटावर हातोडा मारण्याचं काम करू नये.
श्रीगोंदा- नितीन रोही,
श्रीगोंदा शहरातील अतिक्रमनाबाबत राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संदीप उमाप व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप यांनी श्रीगोंदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ढोरजकर व जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांना मेलद्वारे पत्र देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की,२५ मार्च २०२२ रोजी तत्कालीन मुख्याधिकारी मा मंगेश देवरे साहेब यांनी श्रीगोंदा शहराच्या विकासासाठी व रहदारीच्या अडचणी दूर करण्यासाठी शहरातील अतिक्रमणे काढली होती..पण हे सरसकट अतिक्रमणे न निघता फक्त छोट्या व्यावसायिकांच्या,टपरी धारकांच्या,फळ विक्रेत्यांच्या पोटावर हातोडा मारण्याच काम करण्यात आलं..आजची परिस्थिती पहिली असता आता कोठे तरी पाऊस पडला आहे.दिवाळी,दसऱ्यासारखे सणसुद ऐन तोंडावर आलेले आहेत.दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊन लोकांचे व्यवसाय ठप्प पडण्याची वेळ आली होती.लोक कर्जबाजारी झाली आहेत.जर आता या गोरगरीब टपरी व्यवसाय धारकांचे, फळ विक्रेत्यांचे अतिक्रमणे काढली तर या लोकांपुढे आत्महत्या करण्यापलीकडे कोणताही पर्याय उरलेला नसेल.
अपघात कधी होतात? जर रस्त्याचे नित्कृष्ट काम एखादा ठेकेदार करत असेल तर नक्कीच रस्त्यावर खड्डे पडणार,वाहून जाणार व अपघात होणार.त्यामुळे अगोदर संबधीत ठेकेदारांनावर कारवाया झाल्या पाहिजेत.एखांद्या इमारतीला बांधकाम परवानगी आहे पण पथकिनारवर्ती नियमाचा भंग होतोय की नाही हे तपासून त्यांचे अतिक्रमणे आगोदर काढली पाहिजेत..
तसेच श्रीगोंदा शहरातील अनधिकृत इमारती, बांधकाम परवाना नसलेल्या इमारती, पार्किंग नाही अशा इमारती, अनधिकृत मेडिकल, महादजी शिंदे सरकारने(रयत शिक्षण संस्था सातारा)यांनी कसण्यासाठी दिलेल्या जमिनीचा पालिका हद्दीत झालेला दुरुपयोग, त्या जमिनीवर बांधलेले अनधिकृत बांधकामे,या सर्व गोष्टींचा नगरपरिषदेने सर्वे करावा त्यांनतर आपण हे अतिक्रमणे वृत्तपत्राद्वारे जाहीर करून स्वतः काढण्याचे आव्हान करावे..जेणेकरून श्रीगोंदा शहराचा विकास होईल,रहदारीला अडचणी न येता अपघाताचे प्रमाण कमी होईल असे निवेदनात म्हंटले गेले आहे.
तसेच फळ विक्रेते व टपरी धारकांना सवलत देऊन रस्त्याला अडचण न होता थोडे थोडे मागे सरकून घेण्यासाठी सांगून सहकार्य करून पावसाच्या दिवसात ही कुटुंबे उघड्यावर येणार नाहीत.
जर नगरपरिषदेने फक्त सर्वसामान्य टपरीधारक व फळ विक्रेते टार्गेट केले तर होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबादरी प्रशासनाची असेल असे निवेदनात सांगण्यात आले आहे.यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख संतोष शिंदे, युवासेना शहराध्यक्ष शिवसेना संदीप भोईटे,राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय खेतमाळीस,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संदीप उमाप,शहर कार्याध्यक्ष जितेंद्र पाटोळे,राष्ट्रवादी जिल्हाउपाध्यक्ष भगवान गोरखे,राजेंद्र राऊत,गणेश ताडे,नंदाबाई गोरे,अलका ससाणे,सरस्वती दातीर,मेहताब बेपारी,रमेश काळे,अंकुश उदमले,महेश राऊत,सादिक मणियार आदी अतिक्रमण धारक व नागरिकांच्या सह्या निवेदनावर आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा