ब्रह्माकुमारी गीता पाठशाळेत रक्षाबंधन संपन्न....
बेंबळे /प्रतिनिधी
कली युगाचा अंत होणार, विनाश होणार म्हणजे काय... तर सध्याच्या दुनियेत काम, क्रोध, लोभ, मोह,मत्सर, अहंकार या सहाविकारांचा नाश होणार व मनुष्यप्राणी पवित्र, संयमी, शांत ,निर्लोभी, प्रेमळ व नम्रता हे उच्च गुण आत्मसात करणार.या सृष्टीवरील विकाराने पछाडलेल्या मानवास परमपिता परमात्मा राजयोगाव्दारे ज्ञानामृत देण्याचे काम करत आहे, हे परमात्म्याचे ज्ञान संपादन करून राजयोगाच्या अभ्यासाद्वारे प्रत्येक व्यक्तीचे जीवन कमलपुष्प समान बनवण्याचे व प्रगती आणि उन्नती करण्याचे महान कार्य प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या माध्यमातून केले जाते . प्रत्येक व्यक्तीने हे अध्यात्मिक ज्ञान मिळवण्यासाठी ब्रह्माकुमारी केंद्रास अवश्य भेट द्यावी, देश विदेशात या ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या दोन लाख शाखा असून लाखो नागरिक याचा लाभ घेत आहेत असे प्रतिपादन राज योगिनी ब्र.कु. अनिता दीदी यांनी बेंबळे येथील गीता पाठशाळेत रक्षाबंधन कार्यक्रम प्रसंगी केले. सर्वप्रथम बेंबळे गीता पाठशाळेच्या संचालिका वैजयंती कुलकर्णी यांनी स्वर्गाचे स्वागत केले ,त्यानंतर अनिता बहन आणि सायली बहन यांनी सर्व उपस्थित बंधू भगिनींना राख्या बांधल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजीवनी कदम, भारती भोसले ,साधना लोंढे, सुलभा कुलकर्णी, साधना भोसले,कोमल गाडे, भाऊसाहेब कुलकर्णी, निवृत्ती कदम आदी मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास बेंबळे येथील स्त्री-पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा