महापुराच्या पाण्यामुळे व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचे 34 कोटी रुपये आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांना मिळणार..
मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांच्या
बैठकीत निर्णय..... आमदार बबनदादा शिंदे
बेंबळे ।प्रतिनिधी।
2019 साली सोलापूर जिल्ह्यात झालेल्या सतंत धार पावसामुळे भीमा व सीना नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसान भरपाई चे दोन कोटी रुपये व तसेच 2022 सालच्या ऑक्टोबर महिन्यात माढा तालुक्यात ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झालेल्या भागातील राहिलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे 32 कोटी रुपये आगामी आठ ते दहा दिवसाच्या आत संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होतील अशी माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्तांत असा की 2019 साली सोलापूर जिल्ह्यात सर्व दूर सतंत धार पाऊस झालेला होता, त्यामुळे भीमा व सीना या नद्यांना सतत महापूर आले होते . माढा विधानसभा मतदारसंघातील माढा पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील भीमा आणि सीना नदी काठावरील शेतकऱ्यांची पिके फळबागा व जमीनीचे अतिशय नुकसान झाले होते. सर्व नुकसानीचे पंचनामे होऊन प्रस्ताव कृषी व महसूल खात्याने 2020 सालच्या फेब्रुवारी महिन्यात शासनाकडे पाठवला होता परंतु या नुकसानीचे दोन कोटी 16 लाख रुपये अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाहीत.
याचप्रमाणे 2022 साली ऑक्टोबर महिन्यात ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी होऊन कुर्डूवाडी ,कुर्डू, ढवळस, केम ,भोगेवाडी ,चौबे पिंपरी, जाखले ,अंबाड व कुर्डूवाडी या भागातील शेती, उभी पिके, फळबागा, तलाव तसेच जमिनीचे अतोनात नुकसान झाले होते . कृषी व महसूल खात्याने पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता व या नुकसान भरपाईची रक्कम 100 कोटीच्या आसपास मंजूर झालेली होती . महसूल खात्याने ऑनलाइन पद्धतीने अनेक शेतकऱ्यांच्या बँकखात्यावर या नुकसान भरपाई चे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले आहेत,परंतु ऑनलाइन खात्यावर पैसे जमा करत असताना महसूल खात्याच्या गलथान, दुर्लक्षित व हलगर्जीपणा मुळे एकूण 32 कोटी रुपये रक्कम मिळण्यापासून अनेक नुकसानग्रस्त शेतकरी अध्याप पर्यंत वंचित राहिले होते .
या दोन्ही रकमेसाठी आमदार बबनदादा शिंदे सातत्याने प्रयत्न करत होते, आज मुंबई मंत्रालयात मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांचे बरोबर झालेल्या बैठकीनंतर संबंधित नुकसान भरपाई विषयी चा प्रस्ताव मंत्री महोदयांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांचे कडून ताबडतोब मागवलेले आहेत व ते प्रस्ताव शासनाकडून तातडीने निश्चित मंजूर होऊन येतील व पुढील आठ ते दहा दिवसाच्या आत संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होतील असेही आमदार बबनदादा शिंदे यांनी आवर्जून सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा