*महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज दरांगे-पाटीलांची तोफ कुर्डुवाडीत धडाडणार....*
*माढा-करमाळा तालुक्यात दरांगे पाटीलांचे जबरदस्त आकर्षण...*
: शुक्रवारी कुर्डूवाडीत मनोज जरांगे - पाटील यांची सभा
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे व सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले मिळावेत या प्रमुख मागणीसाठी जालना जिल्ह्य़ातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची शुक्रवार ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता कुर्डूवाडीतील संकेत मंगल कार्यालयात जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती माढा करमाळा तालुका सकल मराठा समाजाचे समन्वयक संजय दादा टोणपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.याबाबत अधिक माहिती अशी की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण आंदोलन सुरु केले होते. तब्बल १७ दिवसानंतर सरकारच्या मध्यस्थीनंतर हे उपोषण जरांगे-पाटील यांनी मागे घेतले. यावेळी त्यांनी सरकारला एका महिन्याचा वेळ दिला होता. आता मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला या मुदतीची आठवण करुन द्यावी लागेल, असे म्हणत पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत.आरक्षणासाठी सरकारवर दबाव राहावा आणि सरकारला मराठा उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील समाजाची ताकद दिसावी म्हणून अंतरवली सराटी येथे १४ ऑक्टोबर रोजी शंभर एकर जागेवर भव्य आरक्षण परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला लाखोच्या संख्येने मराठा बांधवांनी उपस्थित रहावे यासाठी जरांगे-पाटील हे महाराष्ट्रभर दौरा करत प्रत्येक जिल्ह्यात आवाहन करणार आहेत.दरम्यान, माढा व करमाळा तालुक्यातील मराठा बांधवांशी संवाद साधण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांची ६ ऑक्टोबर रोजी कुर्डूवाडी येथे जाहीर सभा होत असून या सभेसाठीच्या मंचावर मनोज जरांगे-पाटील हे एकटेच व्यासपीठावर बसतील तर सर्व समाजबांधव समोर बसतील असा निर्धार सकल मराठा समाज बांधवांनी केला आहे. सभेसाठी १०० स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. तसेच महिलासांठी मुख्य व्यासपीठाच्या समोर सर्वात पुढे स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. वाहन पार्किंग व्यवस्था टेंभुर्णी, करमाळा कडून संकेत मंगल कार्यालयाकडे येणाऱ्या मार्गावर सभा स्थळापासून अर्धा किलोमीटर अंतरावर करण्यात आली आहे, शेटफळ, माढा बार्शी रोडवरून येणार्या वाहनांना त्याच बाजूच्या रोडकडेला पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
सभा वेळेवर सकाळी ९ वाजताच सुरू होणार असून सभेसाठी माढा करमाळा तालुक्यातील समाज बांधवानी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेला सकल मराठा समाजाचे समन्वयक संजय दादा टोणपे, बाबासाहेब गवळी, सुहास टोणपे, निलेश देशमुख,अरूण जगताप, वाहिदभाई शेख, मच्छिंद्र कदम, प्रमोद बागल, सागर कोल्हे, शिवाजीराव गवळी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा