*ग्रामपंचायत स्वनिधीसाठी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांचे लातूरात प्रशिक्षण संपन्न*
*प्रतिनिधी /ज्ञानेश्वर सूर्यवंशी*
लातूर:-राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान २०२२-२३अंतर्गत ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासन व यशदा पुणे यांच्या वतीने आयोजित लातूर येथील कृषी विज्ञान केंद्र येथे मा.सरपंच ग्रामविकास अधिकारी यांचे प्रशिक्षण दि.30व31आक्टोंबर 2023 या काळात संपन्न झाले.
लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील पाच हजार पेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावातील ग्रामपंचायतीच्या सन्मानिय सरपंचांचे व ग्रामविकास अधिकारी यांचे दोन दिवशीय निवासी प्रशिक्षण घेण्यात आले.
त्यात ग्रामविकासासाठी स्वनिधी संकलन,कर संकलनात येणाऱ्या अडचणी व 100%करवसुलीसाठी तयारी वअभ्यास करण्यात आली.दत्तात्रय गिरी उप मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांनी संपूर्ण ग्रामविकासासाठी सरपंचांची भुमिका यावर मार्गदर्शनाखाली व नीता मगर यांच्या समन्वयाने हे प्रशिक्षण घेण्यात आले.
तर कमलाकर सावंत,पंकज शेळके, माधव गंभीरे,उध्दव फड, अपराजित मरगणे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
दुसरे दिवशी दुपार सत्रात स्थानिक कृषी विज्ञान केंद्राच्या विविध उपक्रमासही प्रशिक्षणार्थी यांनी प्रा सतिश बेद्रे यांच्यासह क्षेत्र भेट केली.
सदरील प्रशिक्षण सर्वोत्तम झाल्याचे
सौ शितल पाटील सरपंच सास्तूर, मछिंद्र वाघमारे सरपंच शिरूर ताजबंद व सतिश शिंदे ग्रामविकास अधिकारी वाघोली यांनी समारोपात मांडले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा