Breaking

गुरुवार, ४ जानेवारी, २०२४

सर्वांना भयमुक्त काम करता आले तरच लोकशाही टिकेल,,,, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अभयसिंह जगताप



सर्वांना भयमुक्त काम करता आले तरच लोकशाही टिकेल,,,, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अभयसिंह जगताप


करमाळा प्रतिनिधी /AJ 24Taas News Maharashtra साठी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

- सध्या सामाजिक आणि राजकीय लोकशाहीच्या यशापयशाबद्दल अनेकांच्या मनामध्ये शंकाकुशंकानी गर्दी केली आहे. देशाचे सार्वभौमत्व पाहता आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. जनता सार्वभौम आहे, याची जाणीव आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधाऱ्यांना करून देण्याची वेळ समीप आली असून सर्वांना भयमुक्त काम करता आले तर लोकशाही टिकेल असे मत संवाद दौऱ्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) युवक सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी केले. ते माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने  करमाळा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे बोलताना अभयसिंह जगताप म्हणाले की, २०२४ मध्ये माढा लोकसभेसाठी उमेदवारीसाठी नव्हे तर विचारांची लढाई आहे. हा देश शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणारा असून शरदचंद्रजी पवार  यांना मानणारा हा मतदारसंघ आहे. यंदा या लोकसभा निवडणुकीत निश्चित परिवर्तन घडेल. यासाठी पवार साहेबांच्या पाठीशी इथली जनता ताकद उभा करेल. यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यावा या उदात्त हेतूने हे शिवधनुष्य मी हाती घेतले आहे. किंबहुना पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या उमेदवाराला लोकसभेसाठी उभा करेल त्याला निवडून आणण्याची जबाबदारी एक कार्यकर्ता या नात्याने मी घेत असून करमाळा, माढा, सांगोला, फलटण, माळशिरस, माण, खटाव या मतदार संघात इंडिया आघाडीला मानणारा मतदार बांधव प्रचंड असून स्वहितासाठी नेते मंडळी इतर पक्षांत गेली असली तरी सामान्य जनता मात्र आज ही पवार साहेबांच्या पाठीशी भक्कम असल्याने माढा लोकसभा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे.

लोकशाही कल्पनेच्यामागे कायद्याचे अधिराज्य, नैसर्गिक हक्क, स्वातंत्र्य, समता, बंधुता, ही गतिमान तत्त्वे आहेत. त्याला तिलांजली सध्या मिळत आहे. सामाजिक लोकशाहीचा पाया खंबीर केला तरच राजकीय लोकशाही टिकेल. स्वातंत्र्य, समता व बंधुता या तीन जीवनतत्त्वातील एक तत्त्व गळाले तरी सर्व लोकशाहीचा हेतूच विफल झाल्यासारखे होते. राजकारणातील विशिष्ट लोकांचा दरारा व मक्तेदारी तसेच सामाजिक विषमता हे दृश्य पालटले पाहिजे. असे झाले नाही तर विषमतेची झळ लागलेला वर्ग राजकीय लोकशाहीचे कवच फोडून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. देशाची अर्थव्यवस्था व लोकशाही खिळखिळी बनवणाऱ्या मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेला बेकारी, महागाईच्या खाईत लोटले आहे. सर्वसामान्य जनतेला आधार देत व देश वाचविण्यासाठी दुसरा स्वातंत्र्य लढा उभारण्याची गरज असल्याचे मत अभयसिंह जगताप यांनी यावेळी व्यक्त केले.

या संवाद दौऱ्यादरम्यान जगताप यांनी आदीनाथचे माजी चेअरमन प्रदीप आबा जाधव पाटील, माजी नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी, प्रशांत ढाळे, सुनील सावंत, टायगर ग्रुपचे तानाजीभाऊ जाधव, प्रविण कटारिया, प्रतापराव जगताप आदींच्या भेटी घेतल्या. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, शहराध्यक्ष शिवराज जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन चवरे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण काका जगताप, युवक शहराध्यक्ष आमिर तांबोळी, किसान सेल तालुका अध्यक्ष सचिन नलवडे, तालुका सरचिटणीस समाधान शिंगटे, अजहर जमादार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा