*टेंभुर्णी येथे मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे पायी चालत निघालेल्या आंदोलन करांचे स्वागत*
टेंभुर्णी/ प्रतिनिधी
मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे पायी चालत निघालेल्या आंदोलककाना टेंभुर्णी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची मदत मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली होती.
मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी अक्कलकोट, सोलापूर,मोहोळ आदी ठिकाणाहून हजारो मराठा समाज बांधव व कार्यकर्ते मुंबईकडे निघाले आहेत.रविवारी दुपारी पायी चालत निघालेल्या या कार्यकर्त्यांचे टेंभुर्णीत संभाजी ब्रिगेड व सकल मराठा समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले.प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर व पुढे टेंभुर्णी ग्रामपंचायत समोर अण्णाभाऊ साठे पुतळ्यास पुष्पहार घालून ते पुढे करमाळा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सर्वांचे स्वागत करून त्यांना नाश्ता,पिण्याचे पाणी,चिवडा पाकिटे देण्यात आली.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी मराठा सेवा संघाचे जिल्हा समन्वयक माऊली पवार यांचे स्वागत केले.
यावेळी आरण चे जेष्ठ नेते योगेश भारता (आबा) शिंदे,तुकाराम ढवळे,आमोल जगदाळे, मधुकर देशमुख,नागाभाऊ खटके, औदुंबर (भाऊ) महाडिक,दिलीप भोसले,सुर्यकांत पाटील,नागेश खटके,अमोल जगदाळे,नागाभाऊ खटके,राजेंद्र ढेकणे,गोरख खटके,नाना ढवळे,दीपक पाटील,वैभव महाडिक,महेश पाटील, भजनदास खटके, संतोष खटके, विजय खटके, नागेश खटके, राजाभाऊ येवले, किशोर तळेकर, दत्तात्रय कोल्हे,नवनाथ शिंदे, सचिन खुळे, राजकुमार (दादा) भोसले, अंकुश पाटील, शाहिर आन्ना इंदलकर, रामभाऊ शिंदे,पपेश पाटील, नितीन सालगुडे,राजन जाधव, महेश पवार, प्रमोद डोके,पिसाळ सर, डॉ काळे,सोनंद पाटील, ॲड रणजित पाटील,राहुल तिपाले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी टेंभुर्णी येथील नरसिंह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ही स्टॉल लावून पाणी व नाश्ता साहित्य वाटप केले.तर शिवशंकर हॉटेलचे मालक बाळासाहेब चव्हाण यांनी पंधराशे चिवड्याची पाकीट वाटप केली. या वेळी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सर्व पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून चोक बंदोबस्त ठेवला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा