वादळी वारे व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी ....
ना. अजितदादा पवार यांना आ. बबन दादा शिंदे यांचे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे साकडे
बेंबळे/ प्रतिनिधी.
माढा - करमाळा विधानसभा मतदारसंघातील कुर्डूवाडी ,रोपळे, ढवळस चौभे पिंपरी तसेच माढा मतदारसंघातील टेंभुर्णी परिसर, करकंब भोसे पांढरेवाडी सुगाव अजोती नारायण चिंचोली भटुंबरे श्रीपुर बोरगाव महाळुंग या परिसरात मागील तीन दिवसात व विशेषता रविवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी तुफान वादळी वारे आणि पाऊस झाल्यामुळे या भागात प्रचंड नुकसान झाले आहे .केळीच्या बागा उध्वस्त झाल्या असून चारा वैरण मका व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेले आहेत, रस्त्याच्या कडेला असलेल्या लहान मोठ्या उद्योगांच्या टपऱ्या पूर्णपणे उडून गेल्या आहेत, नारळाचीझाडे उन्मळून पडली आहेत आंब्याच्या झाडावरील कैऱ्या किंवा पाडाला लागलेले आंबे खाली पडले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे ,अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत ,तसेच कांही ठिकाणचे शेड पडले असून नागरिकांना अतिशय त्रास झालेला आहे, उन्हाळ्यामधील असह्य उष्णतामानामुळे नागरिकांचे तसेच पशुधनाचे सध्या हाल होत आहेत ,पाण्याची भीषण टंचाई असून पाण्याअभावी शेतातील ऊस फळबागा मका चारा वैरण ही उभी पिके जळून चालली आहेत व वादळी वाऱ्यामुळे तग धरून असलेली पिके भूई सपाट झालेली आहेत. अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या आहेत, विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे ग्रामीण भागातील कित्येक गावे व वाड्यावरस्त्यावरील विद्युत पुरवठा अनेक तास खंडित झालेला आहे. या सर्व दयनीय अवस्थेमुळे सर्वसामान्यांचे जीवन उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
आमदार बबनदादा शिंदे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना यापूर्वीच कळवले आहे की सात मे रोजी लोकसभेचे मतदान संपल्यानंतर जिल्ह्यातील आचारसंहिता शीथील करण्यात यावी व वादळ वारे व पाणी टंचाई सारख्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने सज्जता दाखवली पाहिजे. त्यानुसार माढा, करमाळा ,माळशिरस, पंढरपूर येथील तलाठी व कृषी अधिकारी यांना आमदार शिंदे यांनी यापूर्वीच सूचना दिलेल्या आहेत व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्या विषयी व नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाकडून प्रयत्न व्हावे असे कळवले आहे परंतु अद्याप कोणतीही हालचाल दिसत नाही.
मुंबईमध्ये आमदार शिंदे यांनी उपमुख्यमंत्री नामदारा अजीत दादा पवार यांची भेट घेऊन त्यांनाही या संबंधित नुकसानीचे त्वरित पंचनामे व्हावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशा प्रकारचे निवेदन देऊन साकडे घातले आहे. सोलापूर चे जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना तातडीने आदेश देऊन गावो गावच्या नुकसानीचे पंचनामे करावेत तसेच अनेक ठिकाणी सध्या निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करावेत अशी ही मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी निवेदनात केलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आमदार बबनदादा शिंदे यांच्या निवेदनानंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करावे व पाणीटंचाईवर आणि जनावरांना चारा वैरण पुरवण्यावर कटाक्षाने लक्ष ठेवावे ,कोणाची गैरसोय होऊ देऊ नये असा आदेश दिलेला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा