Breaking

सोमवार, २७ मे, २०२४

ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल मध्ये यशराज भोसले प्रथम.



ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल मध्ये यशराज भोसले प्रथम. 
टेंभुर्णी प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ टेंभुर्णी संचलित ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज टेंभुर्णी या प्रशालेचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विशेष म्हणजे 17 नंबर खाजगी विद्यार्थी रिपीटर विद्यार्थी रेग्युलर विद्यार्थी या सर्वांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यामध्ये यशराज धनंजय भोसले 81 टक्के गुण घेऊन प्रशालेत प्रथम आला आहे, व ज्ञानेश्वरी औदुंबर कुटे हिने 76.80% गुण घेऊन द्वितीय तर वैष्णवी दिगंबर कुटे हिने 75.80% गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळविला आहे. चार विद्यार्थी विशेष योग्यतेने पास झाले आहेत. प्रथम श्रेणीत अकरा विद्यार्थी व द्वितीय श्रेणीत पाच विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

यावेळी विद्यार्थिनी मिळवलेल्या शंभर टक्के यशाबद्दल व परंपरा कायम राखल्याबद्दल माझी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, गटशिक्षणाधिकारी विकास यादव, संस्थेचे उपाध्यक्ष वैभव कुटे, मार्गदर्शक कैलास खरसांडे, ज्येष्ठ संचालिका यशोदा गाडेकर, संस्थापक हरिश्चंद्र गाडेकर, सचिवा अर्चना गाडेकर, प्रिन्सिपल रेखा गाडेकर, शाळेचे समन्वयक धनंजय भोसले, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास खराडे, शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल ही शाळा विद्यार्थ्यांना घडवणारी शाळा म्हणून याकडे पाहिले जाते. प्रत्येक पालकांचा कल या शाळेकडे असून या शाळेमध्ये शिक्षक कर्मचारी यांचाही कायम धबधबा राहिला असून विद्यार्थी घडवण्याकडे सर्वच शिक्षकांचा कल असतो. उभारी घेतलेली शाळा शून्यातून उभारी घेतलेली शाळा म्हणून या शाळेचे नाव लौकिक आहे या शाळेचे संस्थापक हरिश्चंद्र गाडेकर, सचिवा अर्चना गाडेकर,व प्रिन्सिपल रेखा गाडेकर स्वतः शाळेसाठी तळमळीने कष्ट घेत असतात. शाळेचा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राहिल्याबद्दल पालक प्रतिनिधी चव्हाणवाडीचे राहुल चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
इयत्ता दहावी व बारावीचा निकाल शंभर टक्के लावण्यासाठी प्रयत्न करत असणारे प्राध्यापक हरिश्चंद्र गाडेकर, रेखा गाडेकर, अर्चना गाडेकर, सचिन खुळे, अमर भानवसे, स्नेहल अनपट, तेजश्री सुतार, मनीषा सोनवणे, प्रेरणा कातोरे या सर्वांचे तसेच दहावी व बारावीतील वेगवेगळ्या विषयात 90 पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करतो. तळागाळातील मुलांना उज्वल यश मिळवून देण्यात संस्था नेहमीच अग्रेसर असते.असे वैभव कुटे म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा