टेंभुर्णी : - माढा तालुक्यातील आहेरगाव येथे वीज पडून भाजल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.ही घटना बुधवारी दुपारी ४.३० वा. सुमारास घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,आहेरगाव येथील शेतकरी पांडुरंग किसन जगताप (वय-५७) हे शेतकरी असून ते गावाच्या दक्षिणेस दोन किमी अंतरावर शेतात राहत होते.बुधवारी दुपारी शेतात काम करीत असताना अचानक वादळ व आकाशात ढग दाटून आले.यावेळी विजेचा कडकडाट होऊन पांडुरंग जगताप यांच्या अंगावर वीज कोसळली.यामध्ये जगताप यांचे निधन झाले.घटना घडल्यानंतर जगताप यांना टेंभुर्णी येथे उपचारास दाखल करण्यात आले.मात्र डॉक्टरांनी तपासणी करून मयत झाल्याचे घोषित केले.जगताप यांच्या चेहऱ्यास भाजल्याने गंभीर इजा झाली होती.
पांडुरंग जगताप यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन भाऊ असा परिवार आहे.त्यांचा एक मुलगा ना.उदय सामंत यांचे शासकीय स्वीय सहाय्यक आहेत.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.या घटनेचा पोहेकॉ ज्ञानेश्वर सरडे हे अधिक तपास करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा