वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या केळी व इतर फळबागांचे त्वरित पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी...
आ. बबनदादा शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन व तहसीलदारांना फोन द्वारे सूचना
बेंबळे/ प्रतिनिधी केळी नुकसानीचा फोटो
माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी, उंबरे, करोळे, करकंब परिसर, माळशिरस तालुक्यातील श्रीपुर, महाळुंग ,वाघोली, वाफेगाव परिसर व माढा तालुक्यातील कोंढार भाग आणि बेंबळे परिसरात झालेल्या वादळी वारे आणि अवकाळी पाऊस यामुळे केळी सहित इतर फळबागा, चारा वैरण, आणि इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, तसेच या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत तर विजेच्या तारा तुटल्या असून सर्वत्र विद्युत पुरवठा बंद पडलेला आहे , शेतात राहणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत या सर्व गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन प्रत्येक तालुक्यातील महसूल विभाग व कृषी कार्यालय कर्मचाऱ्यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत व शासनामार्फत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवण्या कामी युद्ध पातळीवर प्रयत्न करावेत असे आव्हान आमदार बबनदादा शिंदे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात केले आहे, त्याचप्रमाणे माढा माळशिरस व पंढरपूरच्या तहसीलदारांना व तालुका कृषी अधिकारी यांना फोन करून आमदार शिंदे यांनी या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावे व अहवाल वरिष्ठाकडे पाठवावा अशा सूचना केलेल्या आहेत. याचप्रमाणे या सर्व नुकसानीची माहिती आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे कडे तातडीने पाठवणार असल्याचेही आमदार बबनदादा शिंदे यांनी सांगितले.
सविस्तर वृत्तांत असा की मागील दोन ते तीन दिवसापासून माढा विधानसभा मतदारसंघात सर्वत्र वादळी वारे व अवकाळी पावसाचा झंजावात पाहायला मिळत आहे . असह्य उष्णतेमुळे व्याकुळ झालेले शेतकरी व नागरिक तसेच पशुधन यांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे कारण हवेतील उष्णतामान कमी होऊन थोडा गारवा निर्माण झाल्यासारखं वातावरण तयार झाले आहे, परंतु या अवकाळी पाऊस व वादळी वारे यामुळे माढा तालुक्यातील कोंढार भागातील आढेगाव, आलेगाव रांजणी, सुरली, भिमानगर ,शिराळ , टेंभुर्णी शहर व आसपास चा परिसर बेंबळे, घोटी, हरी नगर, परिते याचप्रमाणे पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी करोळे उंबरे करकंब सांगवी व परिसर आणि माळशिरस तालुक्यातील श्रीपुर वाघोली वाफेगाव उंबरे वे.या परिसरातील केळी डाळिंब या बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. केळीच्या बागा भुईसपाट झाले असून लाखो रुपयांचा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तर डाळिंबाच्या बागा झाडांचे फाटे मोडल्यामुळे लागलेली फळे जमिनीवर पडली आहेत व नुकसान झाले आहे या सर्व परिसरामध्ये आंब्याच्या कैऱ्या तसेच काही पाडाला लागलेले आंबे विखरून पडले आहेत व अतोनात नुकसान झालेले आहे. कालवा किंवा सिंचन योजनेचे पाणी नसल्यामुळे हजारो एकरातील पिके पाण्याअभावी जळून गेली आहेत व लक्षावधी रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाला आहे, यातच या अवकाळी पाऊस व वादळी वारे यामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे .या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी माढा माळशिरस व पंढरपूर तालुक्याचे तहसीलदार यांना आमदार बबनदादा शिंदे आणि फोनवरून आदेश दिले असून जिल्हाधिकाऱ्यांनाही मेलद्वारे नुकसान भरपाई मिळण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न व्हावेत अशी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे. या निवेदनाच्या प्रती वरिष्ठ पदाधिकारी यांच्याकडेही पाठवण्यात आलेल्या आहेत असे आमदार शिंदे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा