*साखर कारखान्याचे व औद्योगिक वसाहती मधील रासायनिक मळी मिश्रित पाण्यावरती तात्काळ उपाययोजना करावी-औदुंबर भाऊ महाडिक*
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट वतीने निवेदनाद्वारे आंदोलन करण्याचा दिला इशारा
टेंभुर्णी : प्रतिनिधी
टेंभुर्णी येथील औद्योगिक वसाहतीमधील व साखर काराखान्यांचे रासायनिक मळी मिश्रीत प्रदूषीत पाणी लगतच्या उजनी कालवा व सिना-माढा उपसा सिंचन कालव्यात व माढा तालुक्यातील आसपासच्या गावातील गायरान व पडिक जमिनीत सोडण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचा शेतीचा पाण्यासह जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून यासंबंधी उप प्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, सोलापूर यांना यावर उपाययोजना करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद गटाचे) ता. अध्यक्ष औदुंबर देशमुख यांनी निवेदनाद्वारे दिली असून आंदोलन करण्याचा इशारा दिला असल्याचे त्यांनी आज सायंकाळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषद मध्ये सांगितले.
टेंभुर्णी येथील औद्योगिक वसाहती मध्ये मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत. रासायनिक सांडपाण्याची व्यवस्था कंपनीने करणे गरजेचे आहे मात्र खंडोबा डिस्टलरी व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि. पिंपळनेर यांचे केमीकल मिश्रीत पाणी आपासच्या गावांमध्ये टेंभुर्णी, तांबवे, सापटणे, कन्हेरगांव, दहिवली, वेणेगांव, आकुंभे, आहेरगांव, बेंबळे, चव्हाणवाडी, पिंपळनेर, तसेच प्रामुख्याने जवळच असलेल्या कॅनलमध्ये सोडण्यात येत आहे. त्यामुळे आसपासच्या गावातील विहीरी व कुपनलीकेमध्ये सदरचे पाणी उतरत आहे.
त्यामुळे पिकांची मोठी हाणी होत आहे. तसेच जनावरांची व मनुष्यहाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरचे पाणी पिल्याने लहान बालकांना वेगवेगळे आजार होत आहेत. संबंधीत यंत्रणेकडे गावकऱ्यांनी तक्रार केली असता कोणतीही दखल घेतली नाहीत. तरी आपण त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करून आसपासच्या गावांमध्ये होत असलेल्या प्रदुषणास आळा बसवावा, आपण या निवेदनाचा तात्काळ विचार करून त्वरीत योग्य ती काही कार्यवाही करावी, अन्यथा आम्हाला राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. या पत्रकार परिषद वेळी प्रमोद शिंदे, सोमनाथ खडके, सचिन खडके आदी उपस्थीत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा