आझाद युवा फाउंडेशन तर्फे वृक्षारोपण व वृक्ष वाटप.
टेंभुर्णी प्रतिनिधी -टेंभुर्णी येथील आझाद युवा फाउंडेशनच्या वतीने गणेश उत्सव व ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण व वृक्ष वाटप करण्यात आले.
यावेळी आझाद युवा फाउंडेशनचे अध्यक्ष अजिज शेख यांनी बोलताना प्रदूषण ही समस्या दिवेसंदिवस वाढतच आहे,औद्योगिक कचरा थेट मातीत, पाण्यामध्ये आणि हवेत मिसळत आहे, एवढे असूनही लोक प्रदूषणाला आणि त्याच्या परिणामाला गांभीर्याने घेत नाहीत.त्यातच एक खारीचा वाटा म्हणून आम्ही गणेश उत्सव व ईद ए मिलादुन्नबी (मोहम्मद पैगंबर जन्मदिवस) निमित्त "झाडे लावा झाडे जगवा" उपक्रम राबविण्यात आला आपण फक्त झाडे लावून आपले काम संपत नाही तर ही लावलेली झाडे जगवली पाहीजेत तसेच यावेळी
शिवसेना (ठाकरे गट) तालुका प्रमुख मधुकर (आण्णा) देशमुख यांच्यावतीने ही झाडे लावून वाटप करण्यात आली आहेत तसेच मधुकर आण्णा देशमुख यांचे आम्हाला सहकार्य लाभले असे ही सांगितले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मधुकर आण्णा देशमुख, नानासाहेब ढवळे पाटील, किशोर देशमुख,समीर जहागीरदार ,फारुख देशमुख, असलम शेख, इम्तियाज सय्यद,आसिफ शेख, तसेच चिंतामणी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष.सचिन जाधव, नितीन खंडागळे, मयूर मुसळे, धनाजी मुसळे, विजय कुटे, अजय धोत्रे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा