रोजगार हमी योजनेतून पुर्ण झालेल्या विहिरींना वीज कनेक्शनसाठी शेतकऱ्यांनी मागणी करावी.
-आ.बबनदादा शिंदे
माढा विधानसभा मतदारसंघातील माढा,पंढरपूर व माळशिरस तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीरींची कामे पुर्ण झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरण विभाग व सोलर कृषी पंप योजनेतून लाभ घ्यावा असे आ.बबनदादा शिंदे यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना आ.शिंदे म्हणाले की, अनियमित अपु-या पावसामुळे गेल्या काही वर्षात राज्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. दुष्काळी स्थितीमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत आहे. शासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शाश्वत व कायमस्वरुपी पाण्याचा प्रश्न मार्गी लावणेसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिक सिंचन विहीर मंजूर केलेल्या आहेत. माढा,पंढरपूर व माळशिरस तालुक्यात सुमारे 1000 हून अधिक सिंचन विहीरी मंजूर झालेल्या असून काही विहीरींचे खोदकाम पूर्ण झालेली असून अनेक ठिकाणी विहिरींची कामे सुरु आहेत.
माढा,पंढरपूर व माळशिरस तालक्यातील ज्या-ज्या शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींची कामे पूर्ण झालेली आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देणेसाठी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना दिलेल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या विहीरी एल.टी. लाईनच्या जवळ 30 मीटर अंतराच्या आत आहेत अशा शेतकऱ्यांनी कोटेशन भरुन सर्व्हिस कनेक्शन घ्यावे तसेच 30 मीटर पेक्षा जास्त अंतर असेल त्यांनी जवळच्या महा-ई- सेवा केंद्रात जाऊन कुसुम सोलर कृषी पंप योजनेमध्ये नोंदणी करावी असे आवाहन आ.शिंदे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा