*कुर्डुवाडी नगरपरिषदेवर २५ वर्षांहून अधिक काळ भगवा फडकविलेल्य शिवसेनेत ५९ व्या वर्धापनदिन स्मशान शांतता....*
*शिवसेना चार गटांत विभागली तरीही सुतकच....*
*निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर "भ्रष्टाचाराच्या गंगेचा"तालुक्यात चर्चेचा विषय....*
*नागरी प्रश्न वेशीवरच तरीही नेतेमंडळी तुपाशीच....*
कुर्डुवाडी, अरुण कोरे (प्रतिनिधी)
शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन तथाकथित वाघांच्या डरकाळीत कै.बाळासाहेब ठाकरेविना काल पार पडला.परंतू पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव कुर्डुवाडी नगरपरिषदेवर पंचवीस वर्षांपूर्वी पहीला भगवा फडकवून इतिहास घडवणा-या कुर्डुवाडीत सर्वत्र स्मशान शांतता दिसून आली अन् सर्वत्र उलट सुलट चर्चेला ऊत आला आहे.
कै.ठाकरेंच्या काळातील शिवसेना अस्तित्वात आहे का? असाही प्रश्न विचारला जातो आहे.
शिवसेनेची सध्या कुर्डुवाडी शहरात चार गटांत विभागणी झाली आहे.मुळ शिवसेनेचे स्थानिक नेतृत्व गट शांत व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.तर फुटीर शिवसेना शिंदे गट, शिवाजी सावंत बंधू गट व आमदार नारायण आबा गट अशा चार भागात मुळ शिवसेना विभागली गेली आहे.
पक्षाचा एवढा मोठा वर्धापन दिनानिमित्त कोणालाही कसलेही सोयरसुतक असल्याचे दिसून आले नाही.चार गटांत विभागणी झाली असली तरी माजी नगरसेवकांनी आपापल्या हेतूठीच इकडून तिकडे उड्या मारत तालुक्याच्या नेतृत्वाला व मनी पाॅवरला जवळ खेचण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसून येते.
गेल्या सुमारे दहा एक वर्षांपासून कुर्डुवाडी शहरातील पाणी,वीज,गटार स्वच्छता,रस्ते या मुलभूत नागरी सुविधा तर कुणीही सोडवल्या तर नाहीतच उलटपक्षी नागरिकांना वेठीस धरुन त्यांचा ना नगराध्यक्ष,नगरसेवक, प्रशासन अधिकारी, मुख्याधिकारी यांनी नाहक त्रासच दिल्याचे दिसून येते.
पाच वर्षांपासून भुयारी गटारीचा प्रश्न सुटला तर नाहीच रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी अनेक ठिकाणी वहात आहे.कामे पूर्ण न करता कोट्यवधीची बिल मात्र बिनबोभाट निघत आहेत.
तसेच सिध्देश्वर नगर,जिजामाता नगर आदी अनेक वार्ड विना रस्ता, फुटक्या गटारी,आठवड्यातून एखादंच पाणी, अन् अर्थवट नवीन भुयारी गटारीच्या खोदलेल्या खड्ड्यात जीवन कंठत आहेत.किती लहान मुले, वयस्कर माता भगिनी पडले तरीही कुठे माणूसकीचा लवलेशही दिसून आला नाही.याबाबत नागरिकांनी अनेक तक्रारी करूनही ना लोकप्रतिनिधी ना प्रशासन कुणीही दखल घेत नसल्याने नागरिकांत तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.
टक्केवारी,ठेकेदारीच्या भ्रष्टाचाराची गटार गंगेचं पाणी मात्र सर्वांनी चाखल्याच जनतेनं उघड्या डोळ्यांनी पाहिले परंतु त्याविरुद्ध चळवळ मात्र कुणी उभी करु शकले नाही.ज्यांनी कुणी कागदी घोड्याची हेराफेरी केली त्यांचाही आवाज भ्रष्टाचारातच दबला गेला.
प्रशासकीय कालावधी सोडला तरीही तत्पूर्वी लाखो-कोट्यावधींची उडाण घेतल्याची कबुली देऊन माजी लोकप्रतिनिधींनीही जाहीर समर्थने केली आहेत.
तालुक्याच्या नेतृत्वानेही फक्त आमदारकीला मताची पोळी भाजून घेण्यापलीकडे काहीही नागरी समस्या सोडविण्यासाठी काही केल्याचेही दिसून येत नाही.नवीन पाणी पुरवठा योजनेचे तर नुसतं राजकारणच केले गेले.
तीन महिन्यांवर नगरपरिषदेच्या निवडणूका येऊन ठेपल्या आहेत.प्रशासकीय हालचाली दिसत असल्या तरी स्थानिक उमेदवारांच्या हालचालीपेक्षा सुप्तावस्थेत नेतृत्वाच्या हालचाली मात्र वाढत्या आहेत.
शिवसेना विभागली गेल्याने त्याचा फायदा अन्य पक्ष उठविणार की स्थानिक आघाड्या उघडल्या जाणार?याबाबत उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात केल्या जात आहेत.
आमिषं,मताची किंमत करून विकत घ्यायला सगळेच टपलेले आहेत.जनता जनार्दन त्यास पुन्हा बळी पडणार की काही नवीन घडविण्याच्या विचारात आहे याचीही लवकरच उकल होईल
स्थानिक पातळीवरील राजकीय कानोसा घेतला असता एकही माय का लाल मी एखाद्या पक्षातून अथवा आघाडीतून निवडून येईन असं छातीठोकपणे सांगू शकत नाही हेही सामाजिक कार्याचे,लोक चळवळीचे अवमुल्यनच म्हणावे लागेल.अरुण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा