*दहावीचा निकाल याच आठवड्यात लागणार? -शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड*
*aj24taas news*
पुणे विषेश शैक्षणिक प्रतिनिधी
************************
पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेला यंदा राज्यातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी बसले होते तर यंदा दहावीची परीक्षा 4979 परीक्षा केंद्रांवर पार पडली असून दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष आता निकालाकडे लागले असून निकाला नंतरच पुढील शिक्षणाची दारे खुली होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर
राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इयत्ता दहावी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल लागणे अपेक्षित आहे, यानुसार सुरु झालेल्या याच आठवड्यात कधीही निकाल जाहीर होऊ शकतो. दरवर्षी साधारणपणे बारावीचा (एच.एस.सी) निकाल जाहीर झाल्यावर अवघ्या एकदोनच आठवड्याच्या अंतराने दहावीचा निकाल जाहीर केला जातो मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे पेपर तपासणीपासून संबंधित सर्वच गोष्टींना उशीर झाल्याने निकालाची तारीख पार जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत आली आहे. या महिन्याच्या
कोणत्याही दिवशी निकालाची तारीख जाहीर होऊ शकणार असल्याने आयत्या वेळी विद्यार्थी पालक वर्गाची धांदळ उडू नये यासाठी अगोदरच तयारीत राहा' असे आवाहन देखील राज्यमंत्री गायकवाड यांनी केली आहे. दहावीचा निकाल पाहण्याआधी आपले हॉल तिकीट शोधून ठेवा, ज्या दिवशी निकाल असेल तेव्हा mahresult.nic.in सहित maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईट्वर दहावीचे गुण तपासता येतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा