Breaking

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

घोटी गाव तसं चांगलं पण ग्रामपंचायतने समस्येच्या विळख्यात टांगले े *AJ 24 Taas News Maharashtra YouTube channel

घोटी गाव तसं चांगलं पण ग्रामपंचायतने समस्येच्या विळख्यात टांगले

 बेंबळेप्रतिनिधी/ सज्जन शिंदे 
*AJ 24 Taas News Maharashtra YouTube channel

बेंबळे प्रतिनिधी:-   ५ हजार लोकसंख्या असलेल्या  माढा तालुक्यातील घोटी गावची स्मशानभूमी ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे अनेक समस्यांच्या विळख्यात अडकली आहे. त्यामुळे येथिल गावकऱ्यांना अंत्यविधीसाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 

सविस्तर वृतांत असा, ५ हजार लोकसंख्या असलेल्या घोटी गावात स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी जाण्यासाठी पक्का रस्ता नाही.  काटेरि झाडा-झुडपांमधून वाट काढत जावे लागते. स्मशानभूमीत शेड तर आहे परंतु अंत्यविधीसाठी आलेल्या लोंकासाठी बसण्यासाठी जागा नाही पुर्ण परीसर झुडपांनी व्यापला आहे. येथे लोकांना सावलीची व्यवस्था सुध्दा नाही. रात्रीवेळी अंत्यविधीसाठी लाईटची सोय नाही. अंधारात अंत्यविधी पार पाडावे लागत आहेत. स्मशानभूमीला कुंपण नसल्याने येथे भटक्या जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा अनेक समस्यांच्या विळख्यात घोटी गावची स्मशानभूमी ग्रामपंचायतीच्या काम चलावू भुमिकेमुळे अडकून पडली आहे. याचा त्रास घोटीकरांना होत आहे. घोटी गावच्या स्मशानभूमीसाठी अडीच एकराचे क्षेत्र आहे. या क्षेत्रात अनेक वेळा कागदोपत्री झाडे लावली गेली पण प्रत्यक्षात मात्र झाडे पाहण्यास मिळत नाही. 

कोट..

शासनाचा लाखो रूपयांचा निधी इतर कामांसाठी वायफळ खर्च केला जातो, परंतु स्मशानभूमीच्या कामांकडे ग्रामपंचायतीकडून मुद्दाम डोळेझाक केली जाते. याचा जाब प्रशासनाला विचारणार व स्मशानभूमीच्या कामासाठी प्रयत्नशील राहणार!

सतिशदादा चव्हाण 
ग्रामपंचायत सदस्य घोटी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा