मधुशाली कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय सलगरा दिवटी येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा
सलगरा दि. (प्रतिनिधी)
AJ 24 Taas News Maharashtra
१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. त्यावेळी भारत हा विविध संस्थानांमध्ये विस्तारलेला होता. त्या मध्ये ५६५ संस्थानांपैकी ५६२ संस्थानांनी भारतात विलिन होण्याचा निर्णय घेतला, परंतु हैदराबाद, जुना गड व काश्मीर या संस्थानांनी स्वतःला वेगळे घोषित केले. हैदराबादने स्वतःला स्वतंत्र घोषित केल्यावर साहजिकच भारताच्या बरोबर मध्यावर एक वेगळाच देश निर्माण होण्याची चिन्हे होती. भारताच्या पोलिसी कारवाईनंतर हैदराबाद संस्थानाचे विलनिकरण भारतात करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील मराठवाडा हा विभाग येतो. आणि म्हणून या मराठवाड्याला १५ ऑगस्ट ऐवजी १७ सप्टेंबर रोजी स्वातंत्र्य मिळाले असल्या कारणाने
१७ सप्टेंबर रोजी मराठवाडा हा अखंड भारतामध्ये विलीन झाला व हैदराबाद संस्थानाची सत्ता संपुष्टात आली. म्हणून या दिनाला 'मराठवाडा मुक्ती संग्राम दिन' म्हणून संबोधले गेले.
त्याच अनुषंगाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ध्वजारोहण करण्यात आले गावचे उपसरपंच संतोष मुळे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य स्वामी एन. एन. प्राध्यापक संतोष केसकर, सचिन गिरी, खंडेराव सुरवसे, स्वप्निल भरगंडे, मुबिन पटेल, नामदेव घोडके, शैला भोसले, श्रद्धा पारवे तसेच कर्मचारी मेहबूब पठाण आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा