*उजनीतून भिमा पात्रात तीस हजार क्युसेकचा विसर्ग .... नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा*
*बेंबळे प्रतिनिधी/ सज्जन शिंदे*
AJ 24 Taas News Maharashtra
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असणारे सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेली उजनी धरण चालू पावसाळी हंगामात पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. अशातच मागील आठवड्यापासून पुणे जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात पावसाने उंसत घेवून शुक्रवार व शनिवार रात्री पुन्हा नव्या दमाने हजेरी लावल्यामुळे उजनी जलसाठ्यात मोठी वाढ होवून उजनी धरणातून भिमा पात्रात रविवारी सकाळी १५ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. यामध्ये दुपारनंतर वाढ करत १६ दरवाजांद्वारे ३० वीस हजार क्युसेकचा विसर्ग भिमा पात्रात करण्यात आला आहेप्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे तसेच निरा-भिमा संगम येथे विसर्ग २९ हजार ७०० झाला असून भिमा नदी दुथडी भरून वाहत आहे.
पुणे जिल्ह्यातील वडज, डिंभे, घोड, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडीवळे, आंद्रा, पवना, कासारसाई, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला ही धरणे १०० टक्के भरली असल्यामुळे या क्षेत्रात थोडाफार पाऊस झाला तरी याचा परीणाम उजनी जलाशयाच्या विसर्गावर दिसून येणार आहे. यंदाच्या हंगामात पर्जन्यमान बेताचा पण नेटका स्वरूपात झाल्यामुळे महापूराचा फटका नदी काठच्या गावांना न बसता उजनी धरण भरल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. सध्यस्थितीला उजनीवरील सर्व सिंचन योजना कार्यान्वित असुन जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये पाणीसाठा तयार करण्याचे काम या योजनांद्वारे सुरू आहे. असे उजनी धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.
पुणे, सोलापूर, अहमदनगर या तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्याचा पाणीप्रश्न मिटणार आहे. संपूर्ण वर्षभर तिन्ही जिल्ह्यांतील जवळपास पन्नासपेक्षा अधिक साखर कारखाने, पंधरा औद्योगिक वसाहती, अनेक नगर परिषदा, महानगरपालिका व गावांना या उजनीच्या पाणलोट क्षेत्रातून पाणीपुरवठा करण्यात येतो. धरणाच्या पाण्यावर लाखो शेतकरी कुटुंबे, शेतमजूर आणि उद्योजकांचा प्रपंच अवलंबून आहे. यामुळेच उजनी धरणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे भरभराटीचे रहस्य वरदायनी उजनी धरणच असल्याने धरणाच्या लहान मोठ्या घडामोडींवर येथिल शेतकरी लक्ष ठेवून असतो.
*दि. १३/०९/२०२० उजनी धरणातील पाणीपातळी*
सायं ६.०० वा.
*एकूण पाणीपातळी - ४९७.२८५ मीटर
*एकूण पाणीसाठा - ३४७५.५१ दलघमी
*उपयुक्त साठा - १६७२.७० दलघमी
*टक्केवारी - ११०.२५ टक्के
आवक
*दौंड विसर्ग - १०,३३९ क्यूसेक
*बंडगार्डन - ६,५९२ क्यूसेक
विसर्ग
कालवा - २,४५० क्युसेक
बोगदा - १,००० क्युसेक
सिना-माढा उपसा सिंचन - २५९ क्युसेक
दहीगाव उपसा सिंचन - १०५ क्युसेक
वीज निर्मिती - १,६०० क्युसेक
नदी विसर्ग - ३०,००० क्युसेक
निरा-भिमा संगम विसर्ग - २९,७०० क्युसेक
पंढरपूर विसर्ग १६,९९५ क्युसेक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा