Breaking

गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त अभिवादन व जनजागृती**प्रतिनिधी -AJ24Taas News Maharashtra


*मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त  अभिवादन व जनजागृती*


*प्रतिनिधी - प्रतिक भोसले*

उस्मानाबाद - प्रतिनिधी  १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा हा अखंड भारतामध्ये विलीन झाला व हैदराबाद संस्थानाची सत्ता संपुष्टात आली. या दिनाला 'मराठवाडा मुक्ती संग्राम दिन' म्हणून संबोधले गेले. या लढ्यामध्ये शहीद झालेल्या वीर हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा हा मानाचा दिवस, या दिवशी विवेकानंद युवा मंडळ नेहरू युवा केंद्र तसेच जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वीर हुतात्म्यांना पुण्यात स्मृतीस अभिवादन करण्यात आले. या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून शहरातील वेगवेगळ्या मुख्य चौकात, शासकीय कार्यालयांमध्ये नगर परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद व इतर विभागांमध्ये आरोग्य विभागाचे हिवताप, डेंग्यू, मलेरिया विरोधीचे वेगवेगळे बॅनर्स, पोस्टर्स लावण्यात आले, व उपस्थित नागरिकांना स्वच्छतेबद्दल संदेश देण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य विभागाचे वरिष्ठ सहाय्यक रवि गालफाडे, नेहरू युवा केंद्राचे रोहन गाढवे, पोलीस कर्मचारी सायलु बिरमवार, विवेकानंद मंडळाचे बाळकृष्ण साळुंके, महेंद्रप्रताप जाधव, स्वप्नील देशमुख, कृष्णा एडके, बालाजी नामदास, समर्थ शिरसीकर, शुभम मगर व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा