*भिम-अण्णा सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी तहसीलदार यांना निवेदन*
तुळजापूर प्रतिनिधी रूपेश डोलारेउस्मानाबाद
साहित्यरत्न डॉ. आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा व मातंग समाजास अ ब क ड नुसार आरक्षण देण्यात यावे यासाठी भिम-अण्णा सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तुळजापूर तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले. यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते, सुरेश (आप्पा) भिसे, तुळजापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास भाऊ डोलारे,अशोक जाधव, सुधाकर सगट, किशोर साठे, दत्ता कांबळे, आकाश शिंदे, जयराज क्षिरसागर, विकास भिसे, तानाजी कांबळे, युवराज भिसे, विकी झोंबाडे, जयराज झोंबाडे आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा