बालाजी सिरसाट*विनाअनुदान शिक्षकाच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात*
*संभाजी ब्रिगेड शिक्षक आघाडी ची मागणी*
नांदेड प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
* aj24taas
नांदेड:-आज संभाजी ब्रिगेड व शिक्षक आघाडी नांदेड जिल्हा यांच्या वतीने शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना विनाअनुदानित शिक्षक यांच्या अनुदान संदर्भात असणारा GR लवकरात लवकर काढून शिक्षकांना न्याय द्यावा यासाठी निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील विनाअनुदानित शिक्षक वीस वर्षापासून विनावेतन काम करतात. त्यातील काही शिक्षकांना 2016 रोजी 20 टक्के अनुदान देण्यात आले परंतु पुढील टप्पा अद्यापही मिळाला नाही, घोषित शाळांना अजुन ही अनुदान दिले नाही तसेच अघोषित शाळांना सुद्धा अजूनही घोषित करून निधी मंजूर केला नाही ,उच्च माध्यमिक महाविद्यालयांना अनुदान दिले नाही या कारणाने राज्यातील शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे याची दखल घेऊन संभाजी ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड शिक्षक आघाडी नांदेड यांनी निवेदन देऊन सरकारने हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा जर हा प्रश्न सोडवला नाही तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेड चे लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील, जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे हरसदकर, संभाजी ब्रिगेड शिक्षक आघाडी चे जिल्हाध्यक्ष कृष्णा मोरे, संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष राम आनकाडे, अडकुने सर, खानसोळे सर, विलास पाटील उमरदरीकर, सर, कदम सर, सोनवणे सर, भाले सर, इटलोड सर, पोतले सर, रायफले सर, खांडेकर सर, खराटे सर, इंगळे सर आदी शिक्षकांची उपस्थिती होती...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा